शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

फटाक्यांवरील बंदीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप नाराज; पुनर्विचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:44 IST

दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही. हजारो लोकांच्या रोजीरोटीशी संबंधित या प्रश्नावर पुनर्विचार करण्याची मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे, तर विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा धार्मिक भावनांशी जोडला आहे.स्वदेशी जागरण मंचचे सहसंयोजक अश्विनी महाजन म्हणाले की, फटाक्यांच्या व्यवसायावर अनेक लोक अवलंबून आहेत. त्यामुळे प्रदूषण होत असले तरी चिनी फटाक्यांनी अधिक नुकसान होते. चिनी फटाक्यांवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले असून, त्याचा फटका सर्व नियम पाळणाºया भारतीय फटाका व्यवसायाला बसायला नको. या निर्णयाचा सर्वाधिक फटका किरकोळ व्यापाºयांना बसणार आहे. त्यांनी आधीच फटाके खरेदी करून ठेवले आहेत.विहिंपचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार देत स्पष्ट केले की, हल्ली दिवाळीपेक्षा नववर्षाच्या स्वागताला अधिक फटाके वाजविले जातात. हिंदू परंपरांवर प्रश्न उपस्थित करणे हल्ली फॅशन झाले आहे. प्रदूषणाची आठवण हिंदू परंपरांच्या संदर्भातच येते. बकरी ईदच्यावेळीही प्रदूषण होतेच. यावरही विचार केला जावा.शेतीतील काडीकचरा जाळणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. हे रोखण्यासाठी सरकारने योजना तयार करावी. विशेष म्हणजे दिवाळीच्या आसपासच दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांत मोठ्या प्रमाणात काडीकचरा जाळण्यात येतो. त्यावर लक्ष दिल्यास दिल्लीतील प्रदूषण कमी होईल, असे महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :CrackersफटाकेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCrackers Banफटाके बंदी