शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

आर.आर. प्रतिक्रिया- भाग १

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नम्र स्वभावाचा राजकारणी गेला

नम्र स्वभावाचा राजकारणी गेला
- मान्यवरांची शोकसंवेदना :
नागपूर : माजी मंत्री आर.आर. पाटील यांच्या रूपात विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेले नेतृत्व आणि मोकळं व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेल्याची खंत मान्यवरांनी व्यक्त केली. राजकारणात आबांसारखे नि:स्पृह नेते आणि मित्र लाभणे हे खरोखरच भाग्याचे असते. नम्र स्वभावाचा सर्वसमावेशक राजकारणी अशी आबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहील, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचा चेहरा हरपला - अनिल देशमुख
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. त्यांच्या रूपात राष्ट्रवादीचा एक चेहरा हरपला आहे, अशी खंत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. विनम्रता, उत्कृष्ट वक्ते, सामाजिक व राजकीय जाण आणि प्रचंड अभ्यासू व मेहनती प्रवृत्ती ही आबांच्या जमेची बाजू होती. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आबांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. संपूर्ण महाराष्ट्रात डान्सबार बंदी राबविली. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्यांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली, असेही देशमुख म्हणाले.

विकासाचे राजकारण करणारा नेता : कृष्णा खोपडे
राजकारणाचा वापर समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक कसा करून घेता येईल, याचा सतत विचार करणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. आबा विरोधकांनाही विश्वासात घ्यायचे. लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात १२ मजली संकुल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

सामान्यांचा आवाज हरपला : चतुर्वेदी
महाराष्ट्रातील गरीब, उपेक्षित लोकांचे खरे समर्थक व त्यांची बाजू समजून घेणारे व्यक्तिमत्त्व आबांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड झाले आहे. मंत्री असतानाही ते सामान्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळात आवाज उठवायचे. पक्षीय राजकारणाच्या सीमा ओलांडत त्यांनी काम केले. संपूर्ण महाराष्ट्र एका प्रामाणिक नेत्याच्या रूपात आर.आर. पाटील यांना कायम स्मरणात ठेवेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.