शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत नद्यांचे रौद्र रूप

By admin | Updated: August 2, 2015 03:54 IST

देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत.

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत. गुजराततेत ठिकठिकाणी आलेल्या पुरात ६० जण तर पश्चिम बंगालमध्ये ४० लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगा, यमुना, राप्ती, घागरा आणि शारदा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांनी रौद्ररूप धारण केले असल्याने काठावरील भागात दहशत पसरली आहे. बलिया, वाराणसी आणि अलाहाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकवस्तीत पाणी शिरले असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक गावांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर आधीच ४ लाख लोक प्रभावित झालेल्या ओडिशात पुराचा व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात ‘कोमेन’ चक्रीवादळ धडकल्यानंतर प्रचंड पाऊस कोसळत आहे. याशिवाय गुजरात व राजस्थानात मागील दोन दिवसांपासून संततधार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने मोठे क्षेत्र पाण्याखाली बुडाले. कोमेन वादळामुळे ओडिशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे स्पेशल रिलिफ कमिशनर जी.व्ही.व्ही. शर्मा यांनी दिली. मिझोरम, त्रिपुरा आणि आसाममध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.जनजीवन विस्कळीत; रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली असून, कोलकाता शहरातील बहुतांश भागात पाणी शिरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, उद्यापर्यंत गंगेलगतच्या पश्चिम बंगालच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोमेन चक्रीवादळ गुरुवारी बांगलादेशात पोहोचले होते. राजस्थानात अनेक गावे पाण्यातराजस्थानच्या जालौर, सिरोही आणि बिकानेर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. जालौर जिल्ह्यातील सांचौर, भीनमाल, सरवाडा आणि चितळवाडासह नर्मदा धरणाच्या आजूबाजूच्या गावांत पाणी शिरल्याने मार्ग बंद पडले आहेत.