शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उत्तरेत नद्यांचे रौद्र रूप

By admin | Updated: August 2, 2015 03:54 IST

देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत.

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत. गुजराततेत ठिकठिकाणी आलेल्या पुरात ६० जण तर पश्चिम बंगालमध्ये ४० लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगा, यमुना, राप्ती, घागरा आणि शारदा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांनी रौद्ररूप धारण केले असल्याने काठावरील भागात दहशत पसरली आहे. बलिया, वाराणसी आणि अलाहाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकवस्तीत पाणी शिरले असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक गावांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर आधीच ४ लाख लोक प्रभावित झालेल्या ओडिशात पुराचा व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात ‘कोमेन’ चक्रीवादळ धडकल्यानंतर प्रचंड पाऊस कोसळत आहे. याशिवाय गुजरात व राजस्थानात मागील दोन दिवसांपासून संततधार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने मोठे क्षेत्र पाण्याखाली बुडाले. कोमेन वादळामुळे ओडिशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे स्पेशल रिलिफ कमिशनर जी.व्ही.व्ही. शर्मा यांनी दिली. मिझोरम, त्रिपुरा आणि आसाममध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.जनजीवन विस्कळीत; रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली असून, कोलकाता शहरातील बहुतांश भागात पाणी शिरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, उद्यापर्यंत गंगेलगतच्या पश्चिम बंगालच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोमेन चक्रीवादळ गुरुवारी बांगलादेशात पोहोचले होते. राजस्थानात अनेक गावे पाण्यातराजस्थानच्या जालौर, सिरोही आणि बिकानेर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. जालौर जिल्ह्यातील सांचौर, भीनमाल, सरवाडा आणि चितळवाडासह नर्मदा धरणाच्या आजूबाजूच्या गावांत पाणी शिरल्याने मार्ग बंद पडले आहेत.