शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

उत्तरेत नद्यांचे रौद्र रूप

By admin | Updated: August 2, 2015 03:54 IST

देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत.

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत. गुजराततेत ठिकठिकाणी आलेल्या पुरात ६० जण तर पश्चिम बंगालमध्ये ४० लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगा, यमुना, राप्ती, घागरा आणि शारदा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांनी रौद्ररूप धारण केले असल्याने काठावरील भागात दहशत पसरली आहे. बलिया, वाराणसी आणि अलाहाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकवस्तीत पाणी शिरले असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक गावांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर आधीच ४ लाख लोक प्रभावित झालेल्या ओडिशात पुराचा व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात ‘कोमेन’ चक्रीवादळ धडकल्यानंतर प्रचंड पाऊस कोसळत आहे. याशिवाय गुजरात व राजस्थानात मागील दोन दिवसांपासून संततधार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने मोठे क्षेत्र पाण्याखाली बुडाले. कोमेन वादळामुळे ओडिशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे स्पेशल रिलिफ कमिशनर जी.व्ही.व्ही. शर्मा यांनी दिली. मिझोरम, त्रिपुरा आणि आसाममध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.जनजीवन विस्कळीत; रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली असून, कोलकाता शहरातील बहुतांश भागात पाणी शिरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, उद्यापर्यंत गंगेलगतच्या पश्चिम बंगालच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोमेन चक्रीवादळ गुरुवारी बांगलादेशात पोहोचले होते. राजस्थानात अनेक गावे पाण्यातराजस्थानच्या जालौर, सिरोही आणि बिकानेर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. जालौर जिल्ह्यातील सांचौर, भीनमाल, सरवाडा आणि चितळवाडासह नर्मदा धरणाच्या आजूबाजूच्या गावांत पाणी शिरल्याने मार्ग बंद पडले आहेत.