शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरातच पुन्हा घेरले चौकास ! अहमदपुरातील समस्या : राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणे पूर्ववत अहमदपूर : वाहतुकीची कोंडी फुटावी आणि वाहनचालकांसह पादचार्‍यांना ये- जा करताना

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़
शहरातील शासकीय विश्रामगृहापासून शिवाजी चौकापर्यंत संपूर्णपणे उतार आहे़ या ठिकाणी ऑटो, अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबत आहेत़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या जागेवरही या वाहनधारकांनी आपला ठिय्या मांडला आहे़ परिणामी, शहरात अपघताचे प्रमाण वाढले आहे़
गेल्या महिनाभरापूर्वी शहरातील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, पोलिस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती़ तसेच शिवाजी चौकातील अतिक्रमणेही काढण्यात आली़ परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच राहिली़ परिणामी, महिनाभराच्या कालावधीत पुन्हा शहरातील सर्वच ठिकाणची अतिक्रमणे वाढली आहेत़ नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी शहरातील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे़
तसेच सध्या शहरात सर्वाधिक वाहतुकीचे तीन केंद्र असून त्यात शिवाजी चौक, महात्मा बसवेश्वर चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहेत़ या ठिकाणी सिग्नल उभारावेत, अशमी मागणी होत आहे़ अतिक्रमणधारक हातगाडीवाले आणि भाजीपाले विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन सामान्यांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे़
चौकट़़़
लवकरच अतिक्रमणे काढणाऱ़़
शहरातील शिवाजी चौकातील अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत़ लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी व्ही़ डी़ हराळे यांनी सांगितले़