शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

महिनाभरातच पुन्हा घेरले चौकास ! अहमदपुरातील समस्या : राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणे पूर्ववत अहमदपूर : वाहतुकीची कोंडी फुटावी आणि वाहनचालकांसह पादचार्‍यांना ये- जा करताना

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़
शहरातील शासकीय विश्रामगृहापासून शिवाजी चौकापर्यंत संपूर्णपणे उतार आहे़ या ठिकाणी ऑटो, अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबत आहेत़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या जागेवरही या वाहनधारकांनी आपला ठिय्या मांडला आहे़ परिणामी, शहरात अपघताचे प्रमाण वाढले आहे़
गेल्या महिनाभरापूर्वी शहरातील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, पोलिस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती़ तसेच शिवाजी चौकातील अतिक्रमणेही काढण्यात आली़ परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच राहिली़ परिणामी, महिनाभराच्या कालावधीत पुन्हा शहरातील सर्वच ठिकाणची अतिक्रमणे वाढली आहेत़ नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी शहरातील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे़
तसेच सध्या शहरात सर्वाधिक वाहतुकीचे तीन केंद्र असून त्यात शिवाजी चौक, महात्मा बसवेश्वर चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहेत़ या ठिकाणी सिग्नल उभारावेत, अशमी मागणी होत आहे़ अतिक्रमणधारक हातगाडीवाले आणि भाजीपाले विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन सामान्यांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे़
चौकट़़़
लवकरच अतिक्रमणे काढणाऱ़़
शहरातील शिवाजी चौकातील अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत़ लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी व्ही़ डी़ हराळे यांनी सांगितले़