शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

महिनाभरातच पुन्हा घेरले चौकास ! अहमदपुरातील समस्या : राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणे पूर्ववत अहमदपूर : वाहतुकीची कोंडी फुटावी आणि वाहनचालकांसह पादचार्‍यांना ये- जा करताना

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़
शहरातील शासकीय विश्रामगृहापासून शिवाजी चौकापर्यंत संपूर्णपणे उतार आहे़ या ठिकाणी ऑटो, अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबत आहेत़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या जागेवरही या वाहनधारकांनी आपला ठिय्या मांडला आहे़ परिणामी, शहरात अपघताचे प्रमाण वाढले आहे़
गेल्या महिनाभरापूर्वी शहरातील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, पोलिस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती़ तसेच शिवाजी चौकातील अतिक्रमणेही काढण्यात आली़ परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच राहिली़ परिणामी, महिनाभराच्या कालावधीत पुन्हा शहरातील सर्वच ठिकाणची अतिक्रमणे वाढली आहेत़ नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी शहरातील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे़
तसेच सध्या शहरात सर्वाधिक वाहतुकीचे तीन केंद्र असून त्यात शिवाजी चौक, महात्मा बसवेश्वर चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहेत़ या ठिकाणी सिग्नल उभारावेत, अशमी मागणी होत आहे़ अतिक्रमणधारक हातगाडीवाले आणि भाजीपाले विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन सामान्यांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे़
चौकट़़़
लवकरच अतिक्रमणे काढणाऱ़़
शहरातील शिवाजी चौकातील अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत़ लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी व्ही़ डी़ हराळे यांनी सांगितले़