शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

काश्मीरसंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची पर्यटन कंपन्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:46 IST

वातावरण निवळल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या पर्यटनासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पर्यटन कंपन्यांंनी ठरविले आहे

मुंबई : केंद्र शासनाने जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडला. आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन कंपन्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.वातावरण निवळल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्यापर्यटनासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पर्यटन कंपन्यांंनी ठरविले आहे. शिवाय, केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर भविष्यात जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला चांगले दिवस येतील, असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारीत पुलवामा हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर काहीसा परिणाम झाला होता.सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरच्या सहली पुढील १५ दिवसांकरिता पुढे ढकलल्याची माहिती केसरी टुर्सचे संचालक हिमांशू पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सप्टेंबर ते आॅक्टोबरपर्यंत पर्यटन काळ असतो. आता मुख्यत: जम्मू-काश्मीरमधील स्थितीमुळे पर्यटन बंद आहे. जम्मू-काश्मीरसंदर्भात कोणत्याही सहली रद्द केल्या नसून पुढे ढकलण्यात आल्या आहेत, परंतु सध्या तरी या संदर्भात वाट पाहून मगच पुढील दिशा ठरविण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर अमरनाथ यात्रेकरिता गेलेले ४० पर्यटक परतल्याची माहिती यात्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बारडे यांनी दिली. भविष्यातील सहली पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यांचे नियोजन महिन्याभरात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग येथे पर्यटकांची संख्या जास्त आहे. सध्या काश्मीरमध्ये फारसे पर्यटक नव्हते. मात्र, दिवाळीच्या पर्यटनाच्या कालावधीवर याचे पडसाद दिसून येतील आणि प्रतिसाद अल्प असेल, अशी माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजीत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले की, भविष्यात केंद्र शासनाच्या निर्णयानंतर सहलींचे नियोजन करण्यात येईल.काश्मीरच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचा विचार केला असता, हा निर्णय पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक आहे. काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढली की, पर्यटन क्षेत्राचा आवाका वाढेल. त्यामुळे काही काळासाठी स्थानिक पर्यटक व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागेल. मात्र, याचे दूरगामी परिणाम चांगले आहेत, हे लक्षात घ्यायला हवेत.हिमाचल प्रदेशकडे पर्यटकांचा मोर्चाजम्मू-काश्मीरचे पर्यटन बंद झाल्यानंतर पर्यटकांनी हिमाचल प्रदेशला पंसती दर्शविली आहे. याशिवाय, ईशान्य पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, सिक्कीम या पर्यटन स्थळांकडे ओढा वाढणार आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या काळातही याच पर्यटन स्थळांना पर्यटकांची पसंती असेल, असा दावा पर्यटन कंपन्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370tourismपर्यटन