शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची पर्यटन कंपन्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:46 IST

वातावरण निवळल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्या पर्यटनासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पर्यटन कंपन्यांंनी ठरविले आहे

मुंबई : केंद्र शासनाने जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडला. आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन कंपन्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.वातावरण निवळल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्यापर्यटनासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पर्यटन कंपन्यांंनी ठरविले आहे. शिवाय, केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर भविष्यात जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला चांगले दिवस येतील, असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारीत पुलवामा हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर काहीसा परिणाम झाला होता.सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरच्या सहली पुढील १५ दिवसांकरिता पुढे ढकलल्याची माहिती केसरी टुर्सचे संचालक हिमांशू पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सप्टेंबर ते आॅक्टोबरपर्यंत पर्यटन काळ असतो. आता मुख्यत: जम्मू-काश्मीरमधील स्थितीमुळे पर्यटन बंद आहे. जम्मू-काश्मीरसंदर्भात कोणत्याही सहली रद्द केल्या नसून पुढे ढकलण्यात आल्या आहेत, परंतु सध्या तरी या संदर्भात वाट पाहून मगच पुढील दिशा ठरविण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर अमरनाथ यात्रेकरिता गेलेले ४० पर्यटक परतल्याची माहिती यात्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बारडे यांनी दिली. भविष्यातील सहली पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यांचे नियोजन महिन्याभरात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग येथे पर्यटकांची संख्या जास्त आहे. सध्या काश्मीरमध्ये फारसे पर्यटक नव्हते. मात्र, दिवाळीच्या पर्यटनाच्या कालावधीवर याचे पडसाद दिसून येतील आणि प्रतिसाद अल्प असेल, अशी माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजीत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले की, भविष्यात केंद्र शासनाच्या निर्णयानंतर सहलींचे नियोजन करण्यात येईल.काश्मीरच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचा विचार केला असता, हा निर्णय पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक आहे. काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढली की, पर्यटन क्षेत्राचा आवाका वाढेल. त्यामुळे काही काळासाठी स्थानिक पर्यटक व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागेल. मात्र, याचे दूरगामी परिणाम चांगले आहेत, हे लक्षात घ्यायला हवेत.हिमाचल प्रदेशकडे पर्यटकांचा मोर्चाजम्मू-काश्मीरचे पर्यटन बंद झाल्यानंतर पर्यटकांनी हिमाचल प्रदेशला पंसती दर्शविली आहे. याशिवाय, ईशान्य पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, सिक्कीम या पर्यटन स्थळांकडे ओढा वाढणार आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या काळातही याच पर्यटन स्थळांना पर्यटकांची पसंती असेल, असा दावा पर्यटन कंपन्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370tourismपर्यटन