शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रोहिंग्यांना भारतात आश्रय नाही, ते घुसखोर, निर्वासित नाहीत- राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:46 IST

बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या परिसंवादात राजनाथ सिंह म्हणाले की, निर्वासिताचा दर्जा मिळविण्याची एक निश्चित प्रक्रिया असते व यांच्यापैकी कोणीही ती पूर्ण केलेली नाही. त्यांनी भारताकडे राजाश्रयही मागितलेला नाही. त्यामुळे ते बेकायदा स्थलांतरित आहेत. मानवी हक्कांच्या नावाखाली बेकायदा स्थलांतरितांना निर्वासित ठरविण्याची चूक करता कामा नये.म्यानमारच्या सीमेवरील रखाइन प्रांतात बंडखोरांनी सुरक्षा ठाण्यांवर हल्ले केल्यानंतर तेथील लष्कराने जोरदार कारवाई सुरू केली. तेव्हापासून त्या प्रांतातून सुमारे ४.२० लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणणे आहे. त्यापैकी काही हजार रोहिंग्या भारतात आले आहेत.>टीका अनाठायीयोग्य शहानिशा करून रोहिंग्यांना परत येऊ देण्यास म्यानमारची तयारी आहे, असे सांगून, राजनाथ सिंह म्हणाले की, रोहिंग्यांना परत पाठविण्याच्या भारताच्या भूमिकेवर होणारी टीका अनाठायी आहे. रोहिंग्यांना परत पाठविल्याने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन होणार नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या १९५१च्या निर्वासितांसंबंधीच्या समझोत्यावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह