शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

रस्ते मंत्रालयाची आकडेवारीच गडकरींच्या दाव्याला छेद देणारी

By admin | Updated: May 24, 2015 00:00 IST

आधीच्या संपुआ सरकारच्या काळात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण सर्वात किमान पातळीवर पोहोचले होते

नवी दिल्ली : आधीच्या संपुआ सरकारच्या काळात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण सर्वात किमान पातळीवर पोहोचले होते व आताचे रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर हे प्रमाण झपाट्याने वाढले, असा दावा भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला असला तरी त्यांच्याच मंत्रालयाच्या आकडेवारीने तरी त्यांच्या या दाव्याला पुष्टी मिळेत नाही.संपुआ राजवटीच्या शेवटच्या काही महिन्यांत राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण प्रतिदिन दोन किमी एवढे कमी झाले होते व रालोआ सरकारने ते प्रतिदिन १४ किमीपर्यंत वाढविले असा दावा गडकरी यांनी केला होता व भाजपा वर्तुळात त्याचे नेहमी दाखले दिले जात असतात. परंतु रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसते की संपुआ-२ सरकारच्या काळात राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम प्रतिदिन सरासरी ११ किमी पेक्षा खाली कधीही गेलेले नव्हते. वस्तुत: मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर संस्थांची महामार्ग बांधणी सन २०१२-१३ मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन १६ किमी एवढे होते व वर्ष २००९-१० मध्ये ते प्रतिदिन १४ किमी एवढे होते.आता सरकारने रस्ते बांधणीवर अधिक भर दिला आहे व अर्थसंकल्पातही त्यासाठी ४२ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात पूर्वी कधीही नव्हते एवढ्या लांबीचे नवे रस्ते बांधले जातील, असे गडकरी यांचे म्हणणे आहे. श्रेय घेण्याची ही चढाओढ फक्त विद्यमान सरकारपुरते मर्यादित नाही. संपुआ-२ सरकारच्या काळातही सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधल्याचा दावा केला गेला होता. राहुल गांधी यांनी आॅक्टोबर २०१३ मध्ये अशी आकडेवारी दिली होती की, वाजपेयी पंतप्रधान असताना रालोआच्या पाच वर्षांच्या राजवटीत एकूण २३,६५० किमी लांबीचे रस्ते बांधले गेले होते तर संपुआ-१च्या पहिल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ९,५७० किमीचे रस्ते बांधले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)४दुर्दैवाने सत्तेत येणारा प्रत्येक राजकीय पक्ष या आकडेवारीचा राजकारणासाठी वापर करतो व मोठमोठे दावे करीत असतो. पण मुळात अशी तुलना करणेच चुकीचे आहे, असे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एक वरिष्ठ निवृत्त अधिकारी म्हणाला की, वाजपेयी सरकारच्या काळात हाती घेतलेली कामेच कमी होती, त्यामुळे पूर्ण झालेले महामार्गही साहजिकच कमी होते. ४मुळात त्यावेळी निधीही कमी होता व कामे करणारे कंत्राटदारही कमी होते. संपुआ-१ सरकार सत्तेवर येईपर्यंत नव्याने बांधायला घेतलेल्या रस्त्यांची लांबी वाढली, त्यासाठी संस्थागत यंत्रणा स्थापन झाली आणि त्यानंतर खासगी गुंतवणूक आल्याने महामार्ग बांधकामास गती मिळाली.