शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते मंत्रालयाची आकडेवारीच गडकरींच्या दाव्याला छेद देणारी

By admin | Updated: May 24, 2015 00:00 IST

आधीच्या संपुआ सरकारच्या काळात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण सर्वात किमान पातळीवर पोहोचले होते

नवी दिल्ली : आधीच्या संपुआ सरकारच्या काळात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण सर्वात किमान पातळीवर पोहोचले होते व आताचे रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर हे प्रमाण झपाट्याने वाढले, असा दावा भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला असला तरी त्यांच्याच मंत्रालयाच्या आकडेवारीने तरी त्यांच्या या दाव्याला पुष्टी मिळेत नाही.संपुआ राजवटीच्या शेवटच्या काही महिन्यांत राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण प्रतिदिन दोन किमी एवढे कमी झाले होते व रालोआ सरकारने ते प्रतिदिन १४ किमीपर्यंत वाढविले असा दावा गडकरी यांनी केला होता व भाजपा वर्तुळात त्याचे नेहमी दाखले दिले जात असतात. परंतु रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसते की संपुआ-२ सरकारच्या काळात राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम प्रतिदिन सरासरी ११ किमी पेक्षा खाली कधीही गेलेले नव्हते. वस्तुत: मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर संस्थांची महामार्ग बांधणी सन २०१२-१३ मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन १६ किमी एवढे होते व वर्ष २००९-१० मध्ये ते प्रतिदिन १४ किमी एवढे होते.आता सरकारने रस्ते बांधणीवर अधिक भर दिला आहे व अर्थसंकल्पातही त्यासाठी ४२ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात पूर्वी कधीही नव्हते एवढ्या लांबीचे नवे रस्ते बांधले जातील, असे गडकरी यांचे म्हणणे आहे. श्रेय घेण्याची ही चढाओढ फक्त विद्यमान सरकारपुरते मर्यादित नाही. संपुआ-२ सरकारच्या काळातही सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधल्याचा दावा केला गेला होता. राहुल गांधी यांनी आॅक्टोबर २०१३ मध्ये अशी आकडेवारी दिली होती की, वाजपेयी पंतप्रधान असताना रालोआच्या पाच वर्षांच्या राजवटीत एकूण २३,६५० किमी लांबीचे रस्ते बांधले गेले होते तर संपुआ-१च्या पहिल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ९,५७० किमीचे रस्ते बांधले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)४दुर्दैवाने सत्तेत येणारा प्रत्येक राजकीय पक्ष या आकडेवारीचा राजकारणासाठी वापर करतो व मोठमोठे दावे करीत असतो. पण मुळात अशी तुलना करणेच चुकीचे आहे, असे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एक वरिष्ठ निवृत्त अधिकारी म्हणाला की, वाजपेयी सरकारच्या काळात हाती घेतलेली कामेच कमी होती, त्यामुळे पूर्ण झालेले महामार्गही साहजिकच कमी होते. ४मुळात त्यावेळी निधीही कमी होता व कामे करणारे कंत्राटदारही कमी होते. संपुआ-१ सरकार सत्तेवर येईपर्यंत नव्याने बांधायला घेतलेल्या रस्त्यांची लांबी वाढली, त्यासाठी संस्थागत यंत्रणा स्थापन झाली आणि त्यानंतर खासगी गुंतवणूक आल्याने महामार्ग बांधकामास गती मिळाली.