शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

भाजपाच्या कार्यालयावर आरजेडी समर्थकांचा हल्ला

By admin | Updated: May 17, 2017 17:00 IST

बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 17 - बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या बीर चंद पटेल रोडवरील भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून, अनेक गाड्यांची तोडफोडही केली आहे. या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवारातील मिसा भारती यांच्या नावावर दिल्लीतील उच्चभ्रू परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे नुकतेच उघड झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं छापेमारीही केली होती. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी सुनियोजित पद्धतीनं हल्ला केल्याचं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी या आरोपांचं खंडन करत भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा वीट फेकल्याचं सांगितलं. पोलिसांनी दगडफेक करणा-यांची ओळख पटवली असून, त्यांच्याविरोधात कारवाईही केली आहे. शहर पोलीस अधीक्षक चंदन कुशवाह म्हणाले, भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करणारा कोणताही व्यक्ती असो, तो वाचणार नाही. आम्ही परिसरात अतिरिक्त पोलीस बल तैनात केले आहे. भाजपानं निवडणूक आयोगाकडे लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही मुलगे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव आणि आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन केलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गेल्या आठवड्यात लालूप्रसाद यादव, त्यांची खासदार कन्या मीसा भारती आणि दोन्ही मुलांवर 1 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्ट लँड डील्समध्ये सहभागी होण्याचा आरोप केला आहे. बिहारमधील भाजपाचे अध्यक्ष नित्यानंद यांनी राष्ट्रीय जनता दलानं नैराश्येतून कार्यालयावर हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमधला भ्रष्टाचार आणि अराजकतेविरोधात भाजपा नेहमीच लढत राहील. आम्ही या लढाईला कोर्टासह लोकांमध्येही घेऊन जाऊ. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाच्या गुंडांविरोधात कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्यही सुशील मोदी यांनी केलं आहे.