शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
5
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
6
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
7
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
8
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
9
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
10
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
11
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
12
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
13
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
14
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
16
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
17
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
18
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
19
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
20
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी

"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 12:13 IST

RJD Leader Manoj Jha : बिहारच्या आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी थेट राज्यसभेत पंचायत वेब सिरीजचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

Panchayat Web Series in Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवशेनात सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे.  राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी पंचायत या वेबसिरीजचे उदाहरण देऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या तक्रारी आणि सर्वेक्षण अहवालाचा उल्लेख केला. निवडणूक आयोग लोकांचा विश्वास गमावत चालला असल्याचे मनोज झा यांनी म्हटलं.

सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी आपल्या भाषणादरम्यान पंचायत वेब सीरिजचा उल्लेख केला आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. खासदार मनोज झा यांनी एका अहवालाचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर केवळ २८ टक्के लोकांनाच विश्वास असल्याचे म्हटलं. लोकांचा त्यापेक्षा जास्त विश्वास हा पंचायतमधल्या सरपंचावर असल्याचे मनोज झा यांनी म्हटलं . पंचायत ही एक प्रसिद्ध वेब सिरीज आहे ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव यांनी सरपंचाची भूमिका साकारली आहे.

मनोज झा यांनी आणीबाणीवरुन आपलं मत मांडले. "सध्या आणीबाणीची खूप चर्चा होत आहे. खरच परिस्थिती खूप वाईट होती. पण इंदिरा गांधींचे सल्लागार हुशार नव्हते असे मला म्हणायचे आहे. इंदिराजींचे सल्लागार हुशार असते तर त्यांनी असेच होईल असे सांगितले असते. ३५२ वापरायची गरज लागली नसती. या आदेशात सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही संदेश आहे. त्यांच्यासाठी संदेश असा आहे की व्यक्तिकेंद्रित प्रवचनाला मर्यादा आहेत. तर आमच्यासाठी संदेश हा आहे की आम्ही केलेले प्रयत्न पुरेसे नव्हते," असे मनोज झा म्हणाले.

"संपूर्ण निवडणूक काळात बिहारमध्ये होतो. आमच्या जागा कमी झाल्या असतील पण आम्ही बिहारची दिशा बदलली. निवडणुकीच्या वेळी अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. मंगळसूत्र, नळ काढून नेले जातील या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्याचवेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र आम्हाला दोन दिवसांपूर्वीच मेल आला आहे. त्यात आमचा फोन नंबर आणि नाव विचारण्यात आले आहे. एक सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये केवळ २८ टक्के लोकांनी निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचे सांगितले. यापेक्षाही पंचायत वेब सीरिजमधल्या फुलेरा गावच्या सरपंचावर लोकांचा अधिक विश्वास आहे," असे मनोज झा म्हणाले. 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग