शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 12:13 IST

RJD Leader Manoj Jha : बिहारच्या आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी थेट राज्यसभेत पंचायत वेब सिरीजचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

Panchayat Web Series in Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवशेनात सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे.  राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी पंचायत या वेबसिरीजचे उदाहरण देऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या तक्रारी आणि सर्वेक्षण अहवालाचा उल्लेख केला. निवडणूक आयोग लोकांचा विश्वास गमावत चालला असल्याचे मनोज झा यांनी म्हटलं.

सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी आपल्या भाषणादरम्यान पंचायत वेब सीरिजचा उल्लेख केला आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. खासदार मनोज झा यांनी एका अहवालाचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर केवळ २८ टक्के लोकांनाच विश्वास असल्याचे म्हटलं. लोकांचा त्यापेक्षा जास्त विश्वास हा पंचायतमधल्या सरपंचावर असल्याचे मनोज झा यांनी म्हटलं . पंचायत ही एक प्रसिद्ध वेब सिरीज आहे ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव यांनी सरपंचाची भूमिका साकारली आहे.

मनोज झा यांनी आणीबाणीवरुन आपलं मत मांडले. "सध्या आणीबाणीची खूप चर्चा होत आहे. खरच परिस्थिती खूप वाईट होती. पण इंदिरा गांधींचे सल्लागार हुशार नव्हते असे मला म्हणायचे आहे. इंदिराजींचे सल्लागार हुशार असते तर त्यांनी असेच होईल असे सांगितले असते. ३५२ वापरायची गरज लागली नसती. या आदेशात सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही संदेश आहे. त्यांच्यासाठी संदेश असा आहे की व्यक्तिकेंद्रित प्रवचनाला मर्यादा आहेत. तर आमच्यासाठी संदेश हा आहे की आम्ही केलेले प्रयत्न पुरेसे नव्हते," असे मनोज झा म्हणाले.

"संपूर्ण निवडणूक काळात बिहारमध्ये होतो. आमच्या जागा कमी झाल्या असतील पण आम्ही बिहारची दिशा बदलली. निवडणुकीच्या वेळी अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. मंगळसूत्र, नळ काढून नेले जातील या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्याचवेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र आम्हाला दोन दिवसांपूर्वीच मेल आला आहे. त्यात आमचा फोन नंबर आणि नाव विचारण्यात आले आहे. एक सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये केवळ २८ टक्के लोकांनी निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचे सांगितले. यापेक्षाही पंचायत वेब सीरिजमधल्या फुलेरा गावच्या सरपंचावर लोकांचा अधिक विश्वास आहे," असे मनोज झा म्हणाले. 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग