विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणार
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणार
विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणार
विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणारनागपूर- वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता या सी लिंकच्या कठड्याची उंची पाच फूट वाढविण्यात येणार असून त्यावर जाळी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेला लेखी उत्तरात दिली आहे.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या सी लिंकवरून आतापर्यंत नऊ लोकांनी उडी मारून आत्महत्या केली असल्याने सरकार कोणत्या उपाययोजना करणार, असा सवाल कवाडे यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी म्हटले आहे की, जानेवारी ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत या सी लिंकवरून दोन व्यक्तींनी उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्या रोखण्याकरिता परिमंडळ-तीनच्या उपायुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र लिहून सी लिंकच्या दोन्ही मार्गीकेवर दिवसा व रात्री नजरेस पडतील असे नो पार्किंगचे फलक लावणे, दोन्ही मार्गिकेवर सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा उपाययोजना सुचवल्या आहेत. सध्या सी लिंकवर सुरक्षा रक्षक नेमले असून त्यांना संपर्काकरिता वॉकीटॉकी दिलेले आहेत. याखेरीज पर्यावरण खात्याच्या परवानगीने कठड्याची उंची पाच फूटाने वाढवणे आणि जाळी बसवणे हेही उपाय करण्यात येणार आहेत. वरळी पोलीस ठाण्याची बिनतारी गस्ती वाहनाची गस्त सी लिंकवर ठेवलेली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी).....................................................................अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत ५ ते ७ टक्के कमी होणार-मेहताम्हाडाच्या सुधारित ठरावानुसार सदनिकांचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर सुधारित विक्री किंमत काढण्यात येणार असल्याने अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत ५ ते ७ टक्के इतकी कमी होणे अपेक्षित आहे, असा दावा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी विधान परिषदेला दिलेल्या लेखी उत्तरात केला.विजय सावंत यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. अल्प व अत्यल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांची किंमत १५ लाखांपेक्षा अधिक असल्याने त्या या गटातील लोकांना परवडत नसल्याची तक्रार असल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणले होते. त्यावर जानेवारी २०१४ मध्ये ८१४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात दिली होती. त्यामध्ये २९७ अत्यल्प उत्पन्न गटाच्या तर २०७ अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांचा समावेश होता, असे मेहता यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)