शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पर्रिकरांमुळे राज्यसभेत ‘दंगल’

By admin | Updated: August 2, 2016 04:32 IST

पर्रिकरांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळयात नव्याने वादग्रस्त विधाने करून राजधानीत नवी ‘दंगल’ घडवली.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- अभिनेता आमिरखानने ८ महिन्यांपूर्वी असहिष्णुतेच्या संदर्भात जे विधान एका सार्वजनिक कार्यक्रमात केले त्याचा समाचार घेताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळयात नव्याने वादग्रस्त विधाने करून राजधानीत नवी ‘दंगल’ घडवली. राज्यसभेत पर्रिकरांच्या ‘त्या’ विधानांचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. उपसभापती कुरियन यांच्या हस्तक्षेपाला न जुमानता सिताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, मायावती आदींनी संरक्षणमंत्र्याची थेट हजेरी घेतली. काहीशा बचावात्मक पवित्र्यात पर्रिकर म्हणाले, ‘मी कोणाचे नाव घेतले नव्हते आणि कोणालाही धमकावलेही नाही. मोघम आरोपांऐवजी मी नेमके काय बोललो, त्याची चित्रफित सदस्यांनी पहावी आणि मगच कोणत्याही निर्णयाप्रत यावे’आमिरखान संदर्भात पुण्यात पर्रिकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या विरोधात राजधानीत रविवारपासून तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया व त्याचे साद पडसाद उमटत आहेत. शून्य प्रहरात सोमवारी राज्यसभेत हा विषय उपस्थित झाला तेव्हा पर्रिकर स्वत: सभागृहात उपस्थित होते. त्यांना उद्देशून माकपचे सिताराम येचुरी म्हणाले, ‘देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांवर असते. पर्रिकर त्याऐवजी अल्पसंख्यांकांच्या मनात भीती आणि धाकदपटशा चा माहोल निर्माण करीत आहेत.’येचुरीं पाठोपाठ गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘अल्पसंख्य समुदायाला पर्रिकर कोणता धडा शिकवू इच्छितात, ते साऱ्या देशाला कळले पाहिजे.’ मायावती म्हणाल्या, भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्य विशेषत: मुस्लीम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट बनवले जात आहे. वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांवर पंतप्रधान मोदी कारवाई का करीत नाहीत, याचे स्पष्टीकरण त्यांंनी स्वत: या सभागृहात येउन दिले पाहिजे.पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळयात आमिरखानचे नाव न घेता संरक्षणमंत्री पर्रिकर म्हणाले, ‘एक अभिनेता म्हणाला की त्याच्या पत्नीला हा देश सोडून परदेशात जावेसे वाटते. त्याच्या या विधानात अहंकार भरलेला आहे. मी गरीब असेन, माझे घर लहान असेल, तरी त्या घरावर मी प्रेम करीन. छोट्या घराऐवजी मोठे घर बनवण्याचे स्वप्न पाहिन, मात्र मातृभूमीचा त्याग करण्याचा विचार कधी करणार नाही. काही लोक देशाच्या विरोधात बोलण्याचे धाडस करतात. जे लोक असे बोलतात, त्यांना देशातल्या जनतेने धडा शिकवला पाहिजे’. >राजकीय वर्तुळातही उमटले तीव्र पडसादपर्रिकरांच्या विधानाचे गंभीर पडसाद राज्यसभेतच नव्हे तर राजधानीच्या राजकीय वर्तुळातही उमटले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पर्रिकरांच्या विधानाचा समाचार घेतांना रविवारी व्टीट केले की ‘रा.स्व.संघ आणि पर्रिकर देशात सर्वांनाच धडा शिकवू इच्छितात. भित्रे लोक नेहमीच इतरांचा व्देष करतात मात्र ते कधी जिंकत नाहीत.’काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, संरक्षणमंत्री या नात्याने पाकशी दोन हात करण्याचे काम पर्रिकरांवर सरकारने सोपवले आहे. ते काम करण्याऐवजी आमिरखान सारख्या अभिनेत्याला धमकवण्याचे काम ते करीत आहेत.त्यांंच्या विधानावरून एक बाब षपष्टपणे सामोरी येते की या देशात दलित आणि अल्पसंख्यांकांना चिरडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे.