शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तिहेरी तलाकः 'जनतेनं आम्हाला कायदे करण्यासाठी निवडलंय, लोकसभेचं न्यायालय करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 13:32 IST

संसदेचं काम कायदा बनविणं आहे. त्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे. हे विधेयक महिलांच्या हक्काचं आहे

नवी दिल्ली - बहुचर्चित तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मांडले.  मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी हे विधेयक आणलं असून त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे रक्षण होईल असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. मात्र विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत विरोधकांनी गोंधळ केला. काँग्रेसकडून या विधेयकातील काही बाबी घटनाविरोधी असल्याचं सांगत त्याला विरोध केला त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. 

तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेते शशी थरुर म्हणाले की, कोणत्याही एका समुदायाला टार्गेट करण्याऐवजी एक सामान्य विधेयक आणलं जावं. त्यामुळे अशा कायद्याच्या अंतर्गत सर्वांना समान न्याय मिळेल. यावर रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळेल, मुस्लिम महिलांच्या हक्कांचे संरक्षण व्हायला हवे. त्यांना न्याय मिळायला हवा आणि त्या सक्षम झाल्या पाहिजेत असं सांगितले. 

तसेच संसदेचं काम कायदा बनविणं आहे. त्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे. हे विधेयक महिलांच्या हक्काचं आहे. महिलांचा मान राखणं त्यांच्या हक्काचं रक्षण करण याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे लोकसभेला न्यायलय करु नका असा टोला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांना लगावला. 

या विधेयकाला विरोध करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विधेयक घटनेतील 14 आणि 14 या तरतुदीचं उल्लंघन आहे. सरकारला मुस्लिम महिलांबद्दल मोहब्बत, मग शबरीमालातील हिंदू महिलांबाबत का नाही असा सवाल उपस्थित केला.

मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक आणले होते. मात्र, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नव्हतं. डिसेंबरमध्ये हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. मात्र राज्यसभेत जेडीयूने या विधेयकाला विरोध केला होता. 

यावेळीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने केंद्र सरकारच्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आमचा पक्ष या विधेयकाला राज्यसभेत विरोध करील, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे लोकसभेत जरी हे विधेयक मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत ते मंजूर करण्यासाठी भाजपाची कसोटी लागणार आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाtriple talaqतिहेरी तलाक