शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल केवळ ११.६९ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:48 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.केवळ ११.६९ टक्के विद्यार्थी पास झाले असून, त्यात हरयाणातल्या पंचकुल येथील प्रणव गोयल हा देशातून पहिला आला आहे. त्याला ३६० पैैकी ३३७ गुण मिळाले आहेत. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख ही पहिली आली असून, तिला ३१८ गुण मिळाले आहेत.आयआयटी, एनआयटी प्रवेशाची परीक्षा कठीणया परीक्षेत दुसरा क्रमांक कोटा येथील साहिल जैैन व तिसरा क्रमांक दिल्लीच्या कैलाश गुप्ता याने पटकाविला आहे. देशभरातील २३ आयआयटी व एनआयटीच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा २० मे रोजी आॅनलाइन घेण्यात आली होती. देशभरातून या परीक्षेला बसलेल्या १,५५,१५८ मुलांपैैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १६,०६२ विद्यार्थी व २०७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सर्वसाधारण गटातील ८७९४, अन्य मागासवर्गीय गटातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९, अनुसूचित जमाती गटामधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.अनुसूचित जाती गटातून कोटा येथील आयुष कदम, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांतून हैदराबादचा जटोथ शिवा तरुण, अन्य मागासवर्गीय प्रवर्गातून विजयवाडा येथील मयूरी सिवा कृष्णा मनोहर हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे.आयआयटी व एनआयटीच्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसण्याची दोनदा संधी दिली जाते. आता आयआयटी व एनआयटीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया आता १५ जूनपासून सुरू होईल. प्रत्येक ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत त्यानुसार हे प्रवेश दिले जाणार आहेत.मुंबईतील ऋषी अग्रवाल राज्यात पहिलाआयआयटी व एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेत मुंबईतील ऋषी अग्रवाल महाराष्ट्रातून पहिला आला आहे. परळ भोईवाडा येथील ऋषीला ३६० पैकी ३१५ गुण मिळाले. लीलावतीबाई पोदार शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याला खेळाची आवड असून, कराटे या क्रीडाप्रकारात त्याने अनेक पदके प्राप्त केली आहेत.सुपर-३०मध्ये ‘आनंद’आयआयटीसाठी गरीब विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी आनंद कुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या सुपर-३० या संस्थेचे ३० पैकी२६ विद्यार्थी पास झाले. त्यामुळे तेथेही जल्लोष करण्यात आला.मुंबई विभागातील पाच गुणवंतविद्यार्थी क्रमांकऋषी अग्रवाल ०८अभिनवकुमार १२सौम्या गोयल १३अनुज श्रीवास्तव २५पार्थ लतुरिया २९

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्याIndiaभारत