शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल केवळ ११.६९ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:48 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.केवळ ११.६९ टक्के विद्यार्थी पास झाले असून, त्यात हरयाणातल्या पंचकुल येथील प्रणव गोयल हा देशातून पहिला आला आहे. त्याला ३६० पैैकी ३३७ गुण मिळाले आहेत. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख ही पहिली आली असून, तिला ३१८ गुण मिळाले आहेत.आयआयटी, एनआयटी प्रवेशाची परीक्षा कठीणया परीक्षेत दुसरा क्रमांक कोटा येथील साहिल जैैन व तिसरा क्रमांक दिल्लीच्या कैलाश गुप्ता याने पटकाविला आहे. देशभरातील २३ आयआयटी व एनआयटीच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा २० मे रोजी आॅनलाइन घेण्यात आली होती. देशभरातून या परीक्षेला बसलेल्या १,५५,१५८ मुलांपैैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १६,०६२ विद्यार्थी व २०७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सर्वसाधारण गटातील ८७९४, अन्य मागासवर्गीय गटातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९, अनुसूचित जमाती गटामधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.अनुसूचित जाती गटातून कोटा येथील आयुष कदम, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांतून हैदराबादचा जटोथ शिवा तरुण, अन्य मागासवर्गीय प्रवर्गातून विजयवाडा येथील मयूरी सिवा कृष्णा मनोहर हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे.आयआयटी व एनआयटीच्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसण्याची दोनदा संधी दिली जाते. आता आयआयटी व एनआयटीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया आता १५ जूनपासून सुरू होईल. प्रत्येक ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत त्यानुसार हे प्रवेश दिले जाणार आहेत.मुंबईतील ऋषी अग्रवाल राज्यात पहिलाआयआयटी व एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेत मुंबईतील ऋषी अग्रवाल महाराष्ट्रातून पहिला आला आहे. परळ भोईवाडा येथील ऋषीला ३६० पैकी ३१५ गुण मिळाले. लीलावतीबाई पोदार शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याला खेळाची आवड असून, कराटे या क्रीडाप्रकारात त्याने अनेक पदके प्राप्त केली आहेत.सुपर-३०मध्ये ‘आनंद’आयआयटीसाठी गरीब विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी आनंद कुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या सुपर-३० या संस्थेचे ३० पैकी२६ विद्यार्थी पास झाले. त्यामुळे तेथेही जल्लोष करण्यात आला.मुंबई विभागातील पाच गुणवंतविद्यार्थी क्रमांकऋषी अग्रवाल ०८अभिनवकुमार १२सौम्या गोयल १३अनुज श्रीवास्तव २५पार्थ लतुरिया २९

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्याIndiaभारत