शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मुंबईतील अवैध बांधकामे नियमित करण्यास प्रतिबंध

By admin | Updated: April 14, 2015 00:06 IST

हायकोर्टाचे आदेश : राज्य शासनाला चपराकमुंबई : मुंबईतील सुमारे ५६ हजार अवैध बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील प्रस्तावावर कोणताही निर्णय घेऊ नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले.राजेंद्र ठक्कर यांनी त्याबाबत जनहित याचिका केली आहे. मुंबईतील अवैध बांधकामे नियमित करणार असल्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार सुमारे ...


हायकोर्टाचे आदेश : राज्य शासनाला चपराक
मुंबई : मुंबईतील सुमारे ५६ हजार अवैध बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील प्रस्तावावर कोणताही निर्णय घेऊ नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले.
राजेंद्र ठक्कर यांनी त्याबाबत जनहित याचिका केली आहे. मुंबईतील अवैध बांधकामे नियमित करणार असल्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार सुमारे ५६ हजार अवैध बांधकामे नियमित होणार आहे.
मात्र अवैध बांधकामे नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयानेच २००४ मध्ये एक निकाल दिला आहे. त्यात न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. त्यामुळे सरसकट बांधकामे नियमित न करता मार्गदर्शक तत्त्वानुसार नियमन झाले पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीताराम कुंटे समितीचा महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय २२ मार्चला घेतला होता. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे ५६ हजार बांधकामे नियमित होण्याची शक्यता होती. पण हायकोर्टाच्या दणक्याने सरकारला दोन पावले मागे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
...................................
मुंबईतील बेकायदा बांधकामांची आकडेवारी आघाडी सरकारने २०१३ च्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे मांडली होती. शहरातील ५५ हजार ९७२ अनधिकृत बांधकामांपैकी ५१ हजार ७४४ बांधकामांवर कारवाई झाली. ४ हजार २२८ बांधकामांवरील कारवाई प्रलंबित असल्याचे त्यात नमूद केले होते. दुसरीकडे मुंबई शहरासह उपनगरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र राजकीय दबावासह ही प्रकरणे न्यायालयात दाखल झाल्याने बेकायदा बांधकांना अभय मिळते. परिणामी अशा अनधिकृत बांधकांना नोटीस बजाविण्याशिवाय महापालिका प्रशासनाला काहीच करता येत नाही.
...................................
महापालिकेची यंत्रणा तोकडी
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे समितीने राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करत एकप्रकारे त्यांना अभयच देण्याचा प्रयत्न केला होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईमधील बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा नेहमीच तोकडी पडते. मात्र मध्यंतरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने महापालिकेच्या महासभेत बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट उपग्रहाच्या मदतीबाबतचा एक निर्णय घेण्यात आला होता. शिवाय यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडेदेखील पाठविण्यात आला होता. उपग्रहामुळे शहर आणि उपनगरांतील बेकायदा बांधकामांवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. कोणत्याही परिसराचे छायाचित्र मिळवणे आणि तेथे बेकायदा बांधकाम होत असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे सुतोवाच महापालिका प्रशासनाने केले होते.
...................................
कुंटे यांनी सादर केलेला अहवाल मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभाग आणि महसूल खात्याकडे अभ्यासासाठी पाठविला आहे. महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व अहवालातील शिफारशी यांचा अभ्यास केल्यानंतर कायद्याच्या चौकटीत बसवून जी बांधकामे नियमित करणे शक्य आहे, ती नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण आता हायकोर्टाच्या आदेशाने त्याला खिळ बसणार आहे.
...................................