शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मनरेगा रोजगार वाढविण्याची जबाबदारी राज्यांवर

By admin | Updated: December 4, 2015 01:40 IST

मनरेगांतर्गत रोजगार मिळविणाऱ्या कुटुंबांची संख्या गेल्या अडीच वर्षांत कमी झाली असल्याची कबुली ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी राज्यसभेत विजय दर्डा यांच्या

नवी दिल्ली : मनरेगांतर्गत रोजगार मिळविणाऱ्या कुटुंबांची संख्या गेल्या अडीच वर्षांत कमी झाली असल्याची कबुली ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी राज्यसभेत विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.मागणीनुसार काम दिले जात असल्यामुळे रोजगारीची आकडेवारी कमी-जास्त होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सरकारने जागरूकता निर्माण करण्यासह रोजगार वाढविण्याबाबत राज्यांना काही निर्देश दिले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत (मनरेगा) रोजगार मिळविणाऱ्या कुटुंबांची संख्या गेल्या दोन आर्थिक वर्षांत प्रारंभी ५७.७३ लाखांवरून ४६.७३ लाख आणि त्यानंतर २३.२४ लाखांवर आली हे सरकारला माहीत आहे काय? त्याबाबत सरकारने तपशील द्यावा. मजुरी देण्यात विलंब होत आहे काय, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.मनरेगाच्या अंमलबजावणीत अकुशल आणि पर्यायी कामांमध्ये कामगारांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. काम पूर्ण झाल्यानंतरच सरकारकडून पैसा दिला जातो. जारी करण्यात आलेल्या निधीचा उपयोग आणि स्वीकृत आर्थिक तरतुदीनुसार राज्यांना पैसा दिला जातो. मजुरांना पैसे देण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारांना नियमावली निश्चित करतानाच मजुरीची व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे भगत यांनी सांगितले. केंद्र सरकारने राज्यांसोबत एक यंत्रणा स्थापित करण्याचे ठरविले आहे. मागणी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वानुसार काम देण्याची तरतूद निश्चित करण्याचा त्यामागे उद्देश आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी पुरेशा लसीदेशात स्वाइन फ्लूला प्रतिबंध घालण्यासाठी पुरेशा लसी उपलब्ध आहेत. लसी पुरवताना वय गौण मानून प्राधान्य गटांना महत्त्व दिले जाते. या लसी ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ६ ते ८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी आवश्यक ठरतात, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश नड्डा यांनी दिली. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पुरेशा लसी आहेत काय? नव्या विषाणूंशी लढण्याची क्षमता या लसींमध्ये आहे काय? गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्वाइन फ्लूचे संक्रमण जास्त आहे काय, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.सरकारने ट्रायव्हेलेट इनेक्टिव्हेटिड एन्फ्लुएंझा लसीची शिफारस केली असून, ती देशभरात उपलब्ध आहे. आरोग्य परिचर, गर्भवती महिला, हृदय, यकृत, गुदा, मधुमेह, कॅन्सरसारखे दीर्घ आजार तसेच पीडित मुलांना ती देण्यावर भर असेल. एन्फ्लुएंजा ए (एचएन १) पीडीएम २००९ या विषाणूचे संक्रमण डिसेंबर ते पुढील वर्षी मार्चपर्यंत जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषध महानियंत्रकांनी उपरोक्त लसीची शिफारस केली असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.मिठाईतील भेसळ तपासणी राज्यांकडेअन्नसुरक्षा आणि मानक कायदा २००६नुसार मिठाईची शुद्धता आणि त्यातील भेसळीची तपासणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपविण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षा आयुक्तांचे कार्यकारी गट मिठायांचे नमुने घेतात. त्यात बदल करण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांकडे असतात. केंद्राकडे दिवाळीच्या वेळी गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांचा डाटा ठेवला जात नाही. भेसळ करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर असते, असे नड्डा यांनी सांगितले. मिठाईतील भेसळीचा तपास लावणे, योग्य तपासणी आणि गोळा केलेले नमुने एकत्र ठेवणारी यंत्रणा आहे काय? देशाच्या विविध भागांत किती नमुने गोळा करण्यात आले, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.