शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

२५ डिसेंबरची घरवापसी रद्द, पण धर्मांतर आधीच झाल्याचं स्पष्ट

By admin | Updated: December 17, 2014 15:41 IST

डिसेंबर २५ रोजी अलीगढमध्ये ४०० मुस्लीमांचा घरवापसी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे धर्म जागरण मंचाने जाहीर केले आहे.

लोकमत ऑनलाइन 
अलीगढ (उत्तर प्रदेश), दि. १७ - डिसेंबर २५ रोजी अलीगढमध्ये ४०० मुस्लीमांचा घरवापसी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे धर्म जागरण मंचाने जाहीर केले आहे. अर्थात, या मुस्लीमांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून त्यांचे त्यांच्या मूळच्या समाजासमोर स्वागत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असेही मंचाने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. जिल्हा प्रशासनाने धमकावल्यामुळे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी सूचना केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मंचाच्या कार्यकर्तायंनी सांगितले. प्रसारमाध्यमांतून, फोन करून तसेच अटक करण्याच्या धमक्या देत जिल्हा प्रशासनाने मंचाच्या कार्यकरत्यांना धमकावल्याचे मंचाने म्हटले आहे. आम्ही घरवापसी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असली तरी यामुळे तसेच आरएसएसच्या ज्येष्ठांनी सांगितल्यामुळे आपण हा घरवापसीचा कार्यक्रम रद्द करत असल्याचे मंचाचे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रमुख राजेश्वर सिंग यांनी सांगितले.
मूळचे राजपूत असलेल्या व अनेक वर्षांपूर्वी मुस्लीम झालेल्या ४०० जणांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. या सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते असे ते म्हणाले. पुन्हा हिंदुधर्मात आलेल्या या व्यक्ती बुलंदशहर, अलीगड, मथुरा, हाथरस, इटाह, आग्रा व बदाऊन इथल्या असल्याचेही राजेश्वर सिंग म्हणाले. लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी समज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यानंतर काही तासांमध्येच हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला. अर्थात, आत्ता रद्द झालेला हा घरवापसी कार्यक्रम नंतर करू व वेगळ्या ठिकाणी करू असेही सिंग म्हणतात.