शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तोपर्यंत देशात आरक्षण कायम राहणार : रामविलास पासवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:53 IST

भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते.

नवी दिल्ली - पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी तातडीने बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. देशात जोपर्यंत जाती व्यवस्थात अस्तित्वात राहिल तोपर्यंत आरक्षण कायम राहणार, असं पासवान यांनी म्हटले आहे. 

रामविलास पासवान यांच्या आमंत्रणानंतर त्यांच्या निवासस्थानी सोमवारी 50 हून अधिक एससी आणि एसटी खासदारांनी हजेरी लावली होती. यावेळी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचे म्हटले आहे. या निकालानंतर पासवान यांनी जाती व्यवस्थेवरून आपले मत मांडले आहे.

याव्यतिरिक्त पासवान यांनी सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रोसिटी अर्थात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात दिलेल्या निकालावर देखील आपले मत मांडले.  या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या कायद्यानुसार आता गुन्हा नोंदवण्यापूर्वी प्राथमिक चौकशी किंवा पोलिस अधिकाऱ्याच्या परवानगीची अवश्यकता भासणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पासवान यांनी स्वागत केले आहे. 

1989 मध्ये अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला होता. मात्र 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात या कायद्याच्या तरतुदी सौम्य करण्यात आल्या. त्यानंतर या कायद्यातील सुधारणेसाठी काही सुचना पंतप्रधान मोदींकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारने न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ ठरवून 2018 मध्ये या कायद्यात सुधारणा केल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 

तत्पूर्वी भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते.