शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:27 IST

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास 40 लाख लोकांचं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव हटवलं होतं. त्यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.एनआरसीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून नाव हटवलं असं होत नाही, अशा प्रकारचा अर्थ कोणीही काढू नये, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एनआरसीचा एक मसुदा आहे. पुढच्या महिन्याभरात या सर्व 40 लाख लोकांना त्यांचं नावाचा समावेश का केला नाही, याचं कारण सांगितलं जाईल. तसेच ज्याचं नाव NRCतून हटवण्यात आलं आहे, ते ट्रिब्युनलमध्ये स्वतःचे आक्षेप आणि दावे दाखल करू शकतील. त्यानंतर एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर केला जाईल. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी पुढच्या महिन्यात एनआरसीच्या मसुद्यावर अहवाल देणार आहेत.एनआरसीतून नाव हटवल्याचा अर्थ असा नाही की त्यांचं नाव आसाममधल्या मतदार यादीतूनही हटवलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार, मतदाराची नोंदणी करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात अर्जदारानं भारतीय नागरिक असणं, वय वर्षं 18च्या वर असणं आणि संलग्न विधानसभा मतदारसंघात नाव असणं या गोष्टींचा समावेश आहे. तसेच मतदार यादी आणि एनआरसीची यादी बनवण्याचं काम हे वेगवेगळं आहे. तसेच आसामचे निवडणूक अधिका-यांना याचा अहवाल लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 4 जानेवारी 2019ला मतदार यादीचा अंतिम मसुदा पूर्ण केला जाईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी