शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:27 IST

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास 40 लाख लोकांचं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव हटवलं होतं. त्यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.एनआरसीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून नाव हटवलं असं होत नाही, अशा प्रकारचा अर्थ कोणीही काढू नये, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एनआरसीचा एक मसुदा आहे. पुढच्या महिन्याभरात या सर्व 40 लाख लोकांना त्यांचं नावाचा समावेश का केला नाही, याचं कारण सांगितलं जाईल. तसेच ज्याचं नाव NRCतून हटवण्यात आलं आहे, ते ट्रिब्युनलमध्ये स्वतःचे आक्षेप आणि दावे दाखल करू शकतील. त्यानंतर एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर केला जाईल. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी पुढच्या महिन्यात एनआरसीच्या मसुद्यावर अहवाल देणार आहेत.एनआरसीतून नाव हटवल्याचा अर्थ असा नाही की त्यांचं नाव आसाममधल्या मतदार यादीतूनही हटवलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार, मतदाराची नोंदणी करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात अर्जदारानं भारतीय नागरिक असणं, वय वर्षं 18च्या वर असणं आणि संलग्न विधानसभा मतदारसंघात नाव असणं या गोष्टींचा समावेश आहे. तसेच मतदार यादी आणि एनआरसीची यादी बनवण्याचं काम हे वेगवेगळं आहे. तसेच आसामचे निवडणूक अधिका-यांना याचा अहवाल लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 4 जानेवारी 2019ला मतदार यादीचा अंतिम मसुदा पूर्ण केला जाईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी