शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

दिल्ली सीमांवरील बॅरिकेड्स काढली; शेतकऱ्यांना हटवणार की तीव्र आंदोलन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:41 IST

Farmers agitation : बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : रस्ते का अडवता? असा सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांना सवाल करीत महामार्ग मोकळे करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड‌्स हटविण्याचे काम सुरू केले आहे.  बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत. बॅरिकेट्स हटविल्यानंतर आम्हाला आमचा शेतीमाल थेट संसदेच्या आवारात नेता येईल, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांंनी जाहीर केले.

या आंदोलनात जवळपास ५० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी या बॅरिकेट्स लावले होते. त्यानंतर २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे त्यापुढे तारांचे काटेरी कुंपणही उभारण्यात आले. विविध अडथळ्यांमुळे या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी हाेत होती. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली.

महिन्यांपासून लोक येथील वाहतूक कोंडीमुळे वैतागले होते. शेवटी हा विषय सुप्रीम कोर्टात गेला. पोलिसांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ खुला केला आहे. आदेशानुसारच कारवाई केली जात आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स काढले असले तरीही, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर शेतकरी बसले आहेत. तशीच स्थिती टिकरी सीमेवर आहे. पोलीस आपले आंदोलन उधळू शकतात, म्हणून शेतकरी नेते डॉ. दर्शनपाल यांनी शेतकऱ्यांना सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन