शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

दिल्ली सीमांवरील बॅरिकेड्स काढली; शेतकऱ्यांना हटवणार की तीव्र आंदोलन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:41 IST

Farmers agitation : बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : रस्ते का अडवता? असा सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांना सवाल करीत महामार्ग मोकळे करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड‌्स हटविण्याचे काम सुरू केले आहे.  बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत. बॅरिकेट्स हटविल्यानंतर आम्हाला आमचा शेतीमाल थेट संसदेच्या आवारात नेता येईल, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांंनी जाहीर केले.

या आंदोलनात जवळपास ५० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी या बॅरिकेट्स लावले होते. त्यानंतर २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे त्यापुढे तारांचे काटेरी कुंपणही उभारण्यात आले. विविध अडथळ्यांमुळे या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी हाेत होती. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली.

महिन्यांपासून लोक येथील वाहतूक कोंडीमुळे वैतागले होते. शेवटी हा विषय सुप्रीम कोर्टात गेला. पोलिसांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ खुला केला आहे. आदेशानुसारच कारवाई केली जात आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स काढले असले तरीही, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर शेतकरी बसले आहेत. तशीच स्थिती टिकरी सीमेवर आहे. पोलीस आपले आंदोलन उधळू शकतात, म्हणून शेतकरी नेते डॉ. दर्शनपाल यांनी शेतकऱ्यांना सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन