शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 30, 2017 12:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला त्यांनी वाट मोकळी करून दिली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे. केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा लाभ घेणा-यांनी गाडीतूनच नव्हे, तर मनातूनही लाल दिव्याचा मोह काढून टाकावा. देशात VIP कल्चरचा द्वेष केला जातो. मात्र तो द्वेष एवढा खोलवर गेल्याचा मला आताच अनुभव झाला. न्यू इंडियात आता व्हीआयपीच्या ऐवजी EPI (Every Person is Important) वर भर देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांनाही आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. परीक्षा आता संपलेल्या आहेत. तरुणांनी नवे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, टेक्नॉलॉजीपासून दूर जात स्वतःसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, संगीतासारखी वाद्ये शिका किंवा नवीन भाषा शिका, असं आवाहनही त्यांनी देशातील तरुणांना केलं आहे. कोणत्याही ठिकाणी गेल्यास तिथे खूप फिरा, कमीत कमी 3 ते 4 दिवस तिथे थांबा आणि मगच दुस-या ठिकाणी जा, नव्या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यास तिथे खूप शिकायला मिळते, फिरताना फोटो काढा आणि ते #IncredibleIndia सोबत शेअर करा, असंही ते म्हणाले आहेत. निसर्गाने सारे नियम बदलले आहेत. पूर्वी मे-जूनमध्ये उष्णता जाणवायची. आता मार्च-एप्रिलमध्ये तसा अनुभव येतो, जागतिक तापमान वाढ हा एकेकाळी शैक्षणिक अभ्यासाचा विषय होता. आज तो दैनंदिन अनुभवाचा विषय ठरला आहे. कधी कधी आपण एवढे कामात व्यस्त होतो की, उन्हाळ्याच्या दिवसात घरी आलेल्या पोस्टमनला साधे पाणीही विचारत नाही, मात्र असं न करता या कडक उन्हाळ्यात सगळ्यांना पाणी द्या, पाणी बचतीचं महत्त्व जपा, उन्हापासून स्वतःचं आणि आपल्या माणसांचं संरक्षण करा. 5 मे रोजी भारत दक्षिण आशिया सॅटेलाइट लाँच करणार असून, दक्षिण आशियासोबत सहकार्य वाढवण्यासाठी भारताचं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले आहेत.