शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

तामिळनाडूत सापडले प्राचीन संस्कृतीचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:19 IST

तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व २०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले

मदुराई : तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व२०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. आर्किआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (एएसआय)ने केलेल्या उत्खननातून प्राचीन तामिळनाडूमध्ये संगम काळामध्ये वैगई नदीच्या तीरावर ही समृद्ध संस्कृती नांदत होती, असे स्पष्ट झाले आहे.मोहंजोदारो, हरप्पा या संस्कृतींचा शोध लागल्यानंतर आर्यांचीचसंस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगण्यातयेत होते. मात्र प्राचीन भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात द्रविड संस्कृतीचे अवशेष सापडल्याने आर्य येण्याआधीही येथीललोकांची संस्कृती अतिशय समृद्ध होती, हे यामुळे सिद्ध झाले आहे.तामिळनाडूतील तेन्नी, दिंडिगल, शिवगंगा, रामनाथपूरम, मदुराई या पाच जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैगई नदीच्या खोºयात जुन्या संस्कृतीच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी एएसआयने २९३ जागी उत्खनन सुरू केले होते. ते २0१३ च्या सुमारात सुरू झाले.किळादीमध्ये उत्खननाच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी२0१७ मध्ये ख्रिस्तपूर्व २०० वर्षे कालावधीतील नागरी वस्तीचेअवशेष सापडले. तामिळनाडूमध्ये संगम काळापासून नागरी संस्कृती अस्तित्वात होती, याचा हा आजवर सापडलेला सर्वात मोठा व सबळ पुरावा आहे.किळादी येथे विटांनी बांधलेल्या घरांचे अवशेष व १३ पायºयाअसलेली विहीरही सापडली. मातीच्या भांड्यांची ७२ खापरे मिळाली आहेत. त्यावर तामिळलिपीत मजकूर लिहिलेला आहे.त्यात इयानन, उदिरन, वेंदन, संतनावती, सतान अशी काही तामिळ नावे लिहिलेली आढळून आली. किळादी येथे आता वस्तुसंग्रहालय स्थापन होण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र हा निर्णयकेंद्र सरकारच्या अख्यतारीत आहे, असे एएसआयच्या चेन्नई विभागाचे अधीक्षक ए. एम. व्ही. सुब्रमणयम यांनी सांगितले. किळादीप्रमाणेच श्रीलंकेमध्येही अशा संस्कृतीचे अवशेष उत्खननात मिळाले आहेत.किळादीतील उत्खननाच्या तिसºया टप्प्यासाठी केंद्र सरकारने ४० लाख रुपयेही मंजूर केले होते. मात्र अचानक हे उत्खनन करणारे एएसआयचे अधिकारी के. अमरनाथ रामकृष्ण यांची गुवाहाटी येथे बदली केली.मग उत्खनन सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मिळण्यास विलंब होऊ लागला. त्यास तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. द्रविडी संस्कृतीचे महान स्वरूप सर्वांसमोर येऊ नये म्हणून केंद्र सरकार उत्खननात अडथळे आणत असल्याचा आरोपही करण्यात आला.