शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

तामिळनाडूत सापडले प्राचीन संस्कृतीचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:19 IST

तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व २०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले

मदुराई : तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व२०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. आर्किआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (एएसआय)ने केलेल्या उत्खननातून प्राचीन तामिळनाडूमध्ये संगम काळामध्ये वैगई नदीच्या तीरावर ही समृद्ध संस्कृती नांदत होती, असे स्पष्ट झाले आहे.मोहंजोदारो, हरप्पा या संस्कृतींचा शोध लागल्यानंतर आर्यांचीचसंस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगण्यातयेत होते. मात्र प्राचीन भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात द्रविड संस्कृतीचे अवशेष सापडल्याने आर्य येण्याआधीही येथीललोकांची संस्कृती अतिशय समृद्ध होती, हे यामुळे सिद्ध झाले आहे.तामिळनाडूतील तेन्नी, दिंडिगल, शिवगंगा, रामनाथपूरम, मदुराई या पाच जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैगई नदीच्या खोºयात जुन्या संस्कृतीच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी एएसआयने २९३ जागी उत्खनन सुरू केले होते. ते २0१३ च्या सुमारात सुरू झाले.किळादीमध्ये उत्खननाच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी२0१७ मध्ये ख्रिस्तपूर्व २०० वर्षे कालावधीतील नागरी वस्तीचेअवशेष सापडले. तामिळनाडूमध्ये संगम काळापासून नागरी संस्कृती अस्तित्वात होती, याचा हा आजवर सापडलेला सर्वात मोठा व सबळ पुरावा आहे.किळादी येथे विटांनी बांधलेल्या घरांचे अवशेष व १३ पायºयाअसलेली विहीरही सापडली. मातीच्या भांड्यांची ७२ खापरे मिळाली आहेत. त्यावर तामिळलिपीत मजकूर लिहिलेला आहे.त्यात इयानन, उदिरन, वेंदन, संतनावती, सतान अशी काही तामिळ नावे लिहिलेली आढळून आली. किळादी येथे आता वस्तुसंग्रहालय स्थापन होण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र हा निर्णयकेंद्र सरकारच्या अख्यतारीत आहे, असे एएसआयच्या चेन्नई विभागाचे अधीक्षक ए. एम. व्ही. सुब्रमणयम यांनी सांगितले. किळादीप्रमाणेच श्रीलंकेमध्येही अशा संस्कृतीचे अवशेष उत्खननात मिळाले आहेत.किळादीतील उत्खननाच्या तिसºया टप्प्यासाठी केंद्र सरकारने ४० लाख रुपयेही मंजूर केले होते. मात्र अचानक हे उत्खनन करणारे एएसआयचे अधिकारी के. अमरनाथ रामकृष्ण यांची गुवाहाटी येथे बदली केली.मग उत्खनन सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मिळण्यास विलंब होऊ लागला. त्यास तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. द्रविडी संस्कृतीचे महान स्वरूप सर्वांसमोर येऊ नये म्हणून केंद्र सरकार उत्खननात अडथळे आणत असल्याचा आरोपही करण्यात आला.