शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

टंचाई योजनांना महिनाभराची मुदतवाढ उपाययोजना : होरपळलेल्या नगर, सोलापूर, पुण्यासह मराठवाड्यास दिलासा

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

मिलिंदकुमार साळवे

मिलिंदकुमार साळवे
श्रीरामपूर : पावसाने पाठ फिरविल्याने महाराष्ट्रातील दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाणी टंचाई निवारणासाठी राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली.
सोमवारी याबाबतचे आदेश राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने काढले. सरकारच्या प्रचलित नियमानुसार पिण्याच्या पाणी टंचाई निवारणार्थ प्रामुख्याने उन्हाळ्यात राबविण्यात येणार्‍या उपाययोजना साधारणपणे ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. यावर्षी राज्याचा बराच मोठा भाग दुष्काळाच्या सावटाखाली आल्यामुळे ३० जूनपर्यंतची टंचाई उपाययोजनांची मुदत २ महिन्यांनी वाढविण्यात आली होती. ही मुदतवाढ ३० ऑगस्टला संपली. गेल्या सप्ताहअखेरीस काही भागात पाऊस झाला. तर काही भागात धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले. पण त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने सोमवारी पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी आणखी एक महिना मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात आता ३० सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ मिळाली. राज्यातील काही भागात आतापर्यंत झालेले अपुरे पर्जन्यमान विचारात घेऊन राज्यात पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
---मराठवाडा, नगर, नाशिकला लाभ----
मराठवाड्यातील सर्व जिल्हे, नाशिक महसूल विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या जिल्ह्यांशिवाय अन्य जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारण उपाययोजना राबविणे आवश्यक वाटेल, अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी तालुकानिहाय गावांमध्ये टंचाई जाहीर करून त्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

---तातडीने कार्यवाहीचे आदेश---
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी सविस्तर माहिती घेऊन व विश्लेषण करुन केवळ पाणी टंचाई निर्माण झालेल्या गाव व वाड्यांमध्ये तसेच नागरी क्षेत्रात आवश्यकतेनुसार स्थानिक परिसर व स्त्रोतांचा विचार करुन पाणी टंचाई निवारणार्थ किमान खर्चाच्या उपाययोजना राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.
- म. भ. सावंत,उपसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.