शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

११ लाख अपात्र शिक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:16 IST

मार्च २०१५ पर्यंत नेमणुका झालेल्या ज्या शिक्षकांकडे शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरलेली शैक्षणिक अर्हता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

नवी दिल्ली : मार्च २०१५ पर्यंत नेमणुका झालेल्या ज्या शिक्षकांकडे शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरलेली शैक्षणिक अर्हता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. देशभरात असे ११ लाख शिक्षक असून अर्हतेअभावी त्यांच्या नोक-यांवर येणारे गंडांतर यामुळे तूर्तास टळणार आहे.शिक्षणहक्क कायदा २०१० मध्ये लागू झाला, तेव्हा विविध स्तरावरील शालेय शिक्षकांसाठी अ.भा. अध्यापक शिक्षण परिषदेने किमान अर्हता ठरवून द्यायची व शिक्षकांनी ती मार्च २०१५ पर्यंत प्राप्त करावी असे ठरले होते. यातूनच ‘टीईटी’सारख्या परीक्षा सुरू झाल्या. राज्यांना पुरेसे अर्हताप्राप्त शिक्षक मिळण्यास किंवा असलेल्या शिक्षकांना मुदतीत अर्हता मिळवण्यात अडचण आली तर केंद्र सरकारने प्रत्येक प्रकरणाचा गुणवत्तेवर विचार करून यात सवलत द्यायची, अशीही तरतूद कायद्यात होती.कायद्याची सात वर्षे अंमलबजावणी केल्यानंतर देशभरात अर्हता नसलेले सुमारे ११ लाख शिक्षक नोकरीत आहेत व त्यांना अर्हता मिळवण्यासाठी मुदतही शिल्लक नाही, असे दिसून आले. यातून मार्ग काढण्यासाठी अर्हतेसाठीची मुदत दोन वर्षांनी वाढविण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचे केंद्र सरकारने ठरविले. यासाठीचे दुरुस्ती विधेयक लोकसभेने २२ जुलै तर राज्यसभेने १ आॅगस्ट रोजी मंजूर केले. यामुळे मार्च २०१५ पर्यंत नेमलेल्या शिक्षकांना अर्हता प्राप्त करण्यासाठी मार्च २०१९ पर्यंतची मुदत मिळेल.त्यांना प्रशिक्षण दिले जाईल - जावडेकरया ११ लाख शिक्षकांना आवश्यक अर्हता प्राप्त करण्यासाठी पुढील दोन वर्षांत नक्की प्रशिक्षित केले जाईल, अशी ग्वाही मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चर्चेच्या उत्तरात दिली. हे प्रशिक्षण ‘स्वयंप्रभा’ योजनेखाली आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने दिले जाईल.यासाठी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या दरम्यान शिक्षकांनी नोंदणी करायची असून, प्रशिक्षण २ आॅक्टोबरपासून सुरू होईल.आॅनलाइनखेरीज ‘डीटीएच’ टीव्हीवरूनही प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासाचे साहित्य सीडीच्या स्वरूपातही मिळेल. वर्षातून एकदा १२ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे वर्ग होतील.