शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

११ लाख अपात्र शिक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:16 IST

मार्च २०१५ पर्यंत नेमणुका झालेल्या ज्या शिक्षकांकडे शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरलेली शैक्षणिक अर्हता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

नवी दिल्ली : मार्च २०१५ पर्यंत नेमणुका झालेल्या ज्या शिक्षकांकडे शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरलेली शैक्षणिक अर्हता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. देशभरात असे ११ लाख शिक्षक असून अर्हतेअभावी त्यांच्या नोक-यांवर येणारे गंडांतर यामुळे तूर्तास टळणार आहे.शिक्षणहक्क कायदा २०१० मध्ये लागू झाला, तेव्हा विविध स्तरावरील शालेय शिक्षकांसाठी अ.भा. अध्यापक शिक्षण परिषदेने किमान अर्हता ठरवून द्यायची व शिक्षकांनी ती मार्च २०१५ पर्यंत प्राप्त करावी असे ठरले होते. यातूनच ‘टीईटी’सारख्या परीक्षा सुरू झाल्या. राज्यांना पुरेसे अर्हताप्राप्त शिक्षक मिळण्यास किंवा असलेल्या शिक्षकांना मुदतीत अर्हता मिळवण्यात अडचण आली तर केंद्र सरकारने प्रत्येक प्रकरणाचा गुणवत्तेवर विचार करून यात सवलत द्यायची, अशीही तरतूद कायद्यात होती.कायद्याची सात वर्षे अंमलबजावणी केल्यानंतर देशभरात अर्हता नसलेले सुमारे ११ लाख शिक्षक नोकरीत आहेत व त्यांना अर्हता मिळवण्यासाठी मुदतही शिल्लक नाही, असे दिसून आले. यातून मार्ग काढण्यासाठी अर्हतेसाठीची मुदत दोन वर्षांनी वाढविण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचे केंद्र सरकारने ठरविले. यासाठीचे दुरुस्ती विधेयक लोकसभेने २२ जुलै तर राज्यसभेने १ आॅगस्ट रोजी मंजूर केले. यामुळे मार्च २०१५ पर्यंत नेमलेल्या शिक्षकांना अर्हता प्राप्त करण्यासाठी मार्च २०१९ पर्यंतची मुदत मिळेल.त्यांना प्रशिक्षण दिले जाईल - जावडेकरया ११ लाख शिक्षकांना आवश्यक अर्हता प्राप्त करण्यासाठी पुढील दोन वर्षांत नक्की प्रशिक्षित केले जाईल, अशी ग्वाही मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चर्चेच्या उत्तरात दिली. हे प्रशिक्षण ‘स्वयंप्रभा’ योजनेखाली आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने दिले जाईल.यासाठी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या दरम्यान शिक्षकांनी नोंदणी करायची असून, प्रशिक्षण २ आॅक्टोबरपासून सुरू होईल.आॅनलाइनखेरीज ‘डीटीएच’ टीव्हीवरूनही प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासाचे साहित्य सीडीच्या स्वरूपातही मिळेल. वर्षातून एकदा १२ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे वर्ग होतील.