शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'आप'च्या सत्येंद्र जैन यांना ३६० दिवसांनंतर दिलासा; ४२ दिवसांसाठी बाहेर येणार; SC कडून अंतरिम जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 13:17 IST

सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती.

आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. कोर्टाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर ४२ दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे, सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे २०२२ रोजी अटक केली होती. आता जैन यांना ३६० दिवसानंतर जामीन मिळाला.

सत्येंद्र जैन गुरुवारी तिहाड जेलमधील बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना डीडीयू रुग्णालयात शिफ्ट केलं होतं. यावेळी त्यांना ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. 

Maharashtra Politics : शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला

सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले.  'जी व्यक्ती रात्रंदिवस चांगले उपचार आणि जनतेला चांगले आरोग्य देण्यासाठी झटत होती, आज त्या चांगल्या व्यक्तीला हुकूमशहाने त्रास दिला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार असतो - प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त "मी" मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. देव सर्व पाहत आहे, तो सर्वांना न्याय देईल. सत्येंद्रजी लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं. 

सत्येंद्र जैन गेल्या १ वर्षापासून तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, जैन यांच्या वकिलांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत, त्यांचे वजन ३५ किलोने कमी झाले आहे. यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.  

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल