शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

दूरसंचार क्षेत्रात आता रिलायन्सची ‘जिओ’गिरी

By admin | Updated: September 2, 2016 06:20 IST

दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘रिलायन्स जिओ’ योजना लाँच करत या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार असल्याचे

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘रिलायन्स जिओ’ योजना लाँच करत या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार असल्याचे गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. डिजिटल क्षेत्रात रिलायन्सने टाकलेले हे पाऊल म्हणजे नवी ‘जिओ’गिरी मानली जात आहे. ‘जिओ’अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देतानाच अंबानी यांनी भारतातील मोबाइल वापराची परिभाषाच बदलणार असल्याचे सांगितले. अंबानी म्हणाले की, संपूर्ण जग डिजिटल होत आहे. यात भारताला मागे राहू दिले जाणार नाही. जिओ हा केवळ व्यवसाय नाही. या माध्यमातून भारतीयांचे जीवन समृद्ध बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जियोच्या ग्राहकांसाठी ५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात ‘मोफत वेलकम आॅफर’ची घोषणा या वेळी करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या एक तासाच्या भाषणात अंबानी यांनी कमीतकमी कालावधीत जिओच्या १० कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे. या वेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि मुलगा आकाश उपस्थित होते. जिओ सेवा देशाला अर्पण करत अंबानी म्हणाले की, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना आहे. आता भारतीयांना डिजिटल होण्यासाठी ‘डाटा प्लॅन’ची चणचण भासणार नाही. प्रत्येक भारतीयाने आता ‘डाटागिरी’ करावी. डिजिटल क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अंबानी यांनी सांगितले की, जिओ भारताला एका नव्या युगात घेऊन जात आहे. ग्राहकांना कोणत्याही प्रकारे ‘ब्लॅक आउट’च्या दिवसाला तोंड द्यावे लागणार नाही. सध्या दिवाळी आणि नव्या वर्षाच्या आरंभी असे केले जाते. यानुसार सेवा देणाऱ्या कंपन्या दुप्पट शुल्क घेतात. आमच्या नेटवर्कवर एका महिन्यात तब्बल पाच कोटी कॉल ड्रॉप झाले. इतर कंपन्यांनी नेटवर्कमध्ये अडथळे आणू नयेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)पोर्टिबिलिटी रोखू नका प्रतिस्पर्धी कंपन्यांना आवाहन करताना अंबानी म्हणाले की, मोबाइल पोर्टिबिलिटीसाठी त्यांनी ग्राहकांना रोखू नये, तसेच सध्याच्या सेवा देणाऱ्या नेटवर्कसोबत जोडणारी सुविधा (पॉइंट आॅफ इंटरकनेक्शन) देणे ही कायद्यानुसार या कंपन्यांची जबाबदारी आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी कोणतेही अडथळे आणू नयेत.