शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दूरसंचार क्षेत्रात आता रिलायन्सची ‘जिओ’गिरी

By admin | Updated: September 2, 2016 06:20 IST

दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘रिलायन्स जिओ’ योजना लाँच करत या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार असल्याचे

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘रिलायन्स जिओ’ योजना लाँच करत या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार असल्याचे गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. डिजिटल क्षेत्रात रिलायन्सने टाकलेले हे पाऊल म्हणजे नवी ‘जिओ’गिरी मानली जात आहे. ‘जिओ’अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देतानाच अंबानी यांनी भारतातील मोबाइल वापराची परिभाषाच बदलणार असल्याचे सांगितले. अंबानी म्हणाले की, संपूर्ण जग डिजिटल होत आहे. यात भारताला मागे राहू दिले जाणार नाही. जिओ हा केवळ व्यवसाय नाही. या माध्यमातून भारतीयांचे जीवन समृद्ध बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जियोच्या ग्राहकांसाठी ५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात ‘मोफत वेलकम आॅफर’ची घोषणा या वेळी करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या एक तासाच्या भाषणात अंबानी यांनी कमीतकमी कालावधीत जिओच्या १० कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे. या वेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि मुलगा आकाश उपस्थित होते. जिओ सेवा देशाला अर्पण करत अंबानी म्हणाले की, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना आहे. आता भारतीयांना डिजिटल होण्यासाठी ‘डाटा प्लॅन’ची चणचण भासणार नाही. प्रत्येक भारतीयाने आता ‘डाटागिरी’ करावी. डिजिटल क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अंबानी यांनी सांगितले की, जिओ भारताला एका नव्या युगात घेऊन जात आहे. ग्राहकांना कोणत्याही प्रकारे ‘ब्लॅक आउट’च्या दिवसाला तोंड द्यावे लागणार नाही. सध्या दिवाळी आणि नव्या वर्षाच्या आरंभी असे केले जाते. यानुसार सेवा देणाऱ्या कंपन्या दुप्पट शुल्क घेतात. आमच्या नेटवर्कवर एका महिन्यात तब्बल पाच कोटी कॉल ड्रॉप झाले. इतर कंपन्यांनी नेटवर्कमध्ये अडथळे आणू नयेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)पोर्टिबिलिटी रोखू नका प्रतिस्पर्धी कंपन्यांना आवाहन करताना अंबानी म्हणाले की, मोबाइल पोर्टिबिलिटीसाठी त्यांनी ग्राहकांना रोखू नये, तसेच सध्याच्या सेवा देणाऱ्या नेटवर्कसोबत जोडणारी सुविधा (पॉइंट आॅफ इंटरकनेक्शन) देणे ही कायद्यानुसार या कंपन्यांची जबाबदारी आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी कोणतेही अडथळे आणू नयेत.