शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या ताब्यातून काश्मीर मुक्त करू !

By admin | Updated: August 14, 2016 05:55 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले एकतृतीयांश काश्मीरही भारताचेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी मूळचे

घघवाल (पंजाब) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले एकतृतीयांश काश्मीरही भारताचेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी मूळचे काश्मीरचे असलेले त्यांच्या कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी पाकिस्तानने गिळलेले कामीर मुक्त करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक ते सर्व काही करेल, अशी ग्वाही शनिवारी दिली. जितेंद्र सिंग यांनी पाकिस्तान सीमेजवळील या गावापासून ‘तिरंगा यात्रा’ सुरू केली आणि पाकिस्तानने बेकायदा बळकावलेले काश्मीर मुक्त करण्यासाठी रीतसर चळवळ सुरू करण्याचा संदेश दिला.येथून कथुआ येथे ‘तिरंगा यात्रा’ रवाना करताना जितेंद्र सिंग म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील एक लढाई अद्यापही बाकी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त करून त्यांचे भारताशी पुनर्मिलन घडविणे यासाठी ही लढाई असेल. (वृत्तसंस्था)यात्रेचे ठिकाण महत्त्वाचेया यात्रेसाठी निवडलेले घघवाल हे ठिकाण त्याचे भौगोेलिक स्थान व तेथून दिला जाणारा संदेश या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे आहे. हे गाव सांबा आणि कथुआ या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही जिल्ह्यांत पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांकडून दहशतवादी हल्ले झालेले आहेत.पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादसह कोटली व तेथील इतर भागांत भारताचा तिरंगा फडकेल तेव्हाच ‘तिरंगा यात्रे’ची खरी सांगता होईल, असे सांगून ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी औपचारिक व निरंतर चळवळ उभी करण्याचा संदेश येथून निघत असलेल्या यात्रेतून जाण्याची गरज आहे.१३ आॅगस्टपासून ‘तिरंगा यात्रा’ स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्यांचे स्मरण करण्यासाठी व देशातील नागरिकांना राष्ट्रभक्ती आणि देशसेवेसाठी समर्पित करण्यासाठी १३ आॅगस्टपासून देशभर अशा ‘तिरंगा यात्रा’ काढण्याचा संदेश मोदींनी दिला होता. त्यानुसार ही यात्रा काढण्यात आली.पाकचे ‘नापाक’ कृत्य सर्व जगाला माहीत आहेपाकव्याप्त काश्मीरही लवकरच स्वतंत्र होईल. मोदी सरकार त्यासाठी काहीही करायचे शिल्लक ठेवणार नाही. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बलुचिस्तानच्या लोकांना पाकपासून स्वातंत्र्य हवे आहे. पण पाकिस्तान त्यांचे स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकत आहे. त्यासाठी पाकिस्तान स्वत:च्याच लोकांवर बॉम्बहल्ले करते व बुद्धिजीवींचे खून पाडते हे सर्व जगाला माहीत आहे, असेही जितेंद्र सिंग यांनी सांगितले.गिलगिट-बाल्टिस्तान पाकने सोडून द्यावेपाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत केले आहे. या भूभागातून पाकिस्तान हटल्यास काश्मीर प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध रोष वाढू लागला आहे. हा भूप्रदेश व्यापक काश्मीरचा भाग समजला जातो. सध्या तो पाकच्या ताब्यात आहे.