शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण परत घेतल्याने वादंग

By admin | Updated: December 15, 2015 03:07 IST

केरळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना देण्यात आलेले निमंत्रण परत घेतल्याने मोठे वादंग निर्माण

नवी दिल्ली/ तिरुअनंतपुरम: केरळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना देण्यात आलेले निमंत्रण परत घेतल्याने मोठे वादंग निर्माण झाले आहे. हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला असून संसदेतही सोमवारी या मुद्यावर प्रचंड गदारोळ झाला.पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर प्रथमच केरळच्या दौऱ्यावर जात असलेले मोदी मंगळवारी कोल्लाम येथे मागास हिंदू समुदाय एझवांची संघटना श्री नारायण धर्म परिपालना योगमतर्फे (एसएनडीपी) आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आर.शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री चांडी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये हा निर्णय म्हणजे एक अत्याधिक दु:खद अनुभव असून राज्यातील जनतेचा अपमान असल्याची खंत व्यक्त केली. या मुद्यावरून लोकसभेत काँग्रेस भाजपा सदस्यांत वाक्युद्ध झाले. पंतप्रधान राजकीय सूड उगविण्यासाठी संवैधानिक पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. परंतु गृहमंत्री राजनाथसिंग यांनी हा आरोप निराधार ठरविला. दरम्यान एनएनडीपीचे प्रमुख वेल्लापल्ली नातेसन यांनी या समारंभातून चांडी यांचे नाव हटण्यास ते स्वत:च जबाबदार असून भाजपा नेतृत्व नाही असा दावा केला. (वृत्तसंस्था)