शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

कर्जप्रवाह सुव्यवस्थित करा, देशातील सरकारी बॅँकांना दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 3:00 AM

निर्मला सीतारामन : देशातील सरकारी बॅँकांना दिले निर्देश

नवी दिल्ली : देशातील कर्जप्रवाह सुव्यवस्थित करा, असे निर्देश केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिले आहेत. व्यवसायांना गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक घडामोडी घटून अर्ध्यावर आल्या आहेत. त्यामुळे यंदा कर्जवृद्धी घसरण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वित्तमंत्र्यांनी या सूचना केल्या आहेत.

सीतारामन यांनी सरकारी मालकीच्या बँकांच्या प्रमुखांची एक बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी छोट्या व्यवसायांना नुकत्याच जाहीर झालेल्या आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजनेंतर्गत (ईसीएलजीएस) कर्ज देण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना बँकांना दिल्या. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, पात्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी यापुढे सुरूच ठेवायला हवे. इतर व्यवसायांच्या कर्ज गरजांची पूर्तताही बँकांनी करायला हवी.ईसीएलजीएस ही योजना केंद्र सरकारने कोविड-१९ साथीसाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या वित्तीय पॅकेजचा भाग आहे. या योजनेंतर्गत व्यवसायांना विनातारण कर्ज देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे आणि पुनर्साठा यासाठी ही कर्जे दिली जातील. या योजनेंतर्गत बँका आणि बिगर-बँक वित्तीय संस्थांना थकहमी देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांचे कर्ज थकल्यास त्यावर बँकांना १०० टक्के हमी मिळणार आहे. छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहन लाभ देण्याचीही तरतूद योजनेत असल्याचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.बॅँकांनी दिलेल्या कर्जाचा आढावाव्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा आढावा घेतला. तसेच ईसीएलजीएसअंतर्गत मंजूर झालेली कर्जे, संभाव्य लाभधारक, संपर्क करणाऱ्यांची संख्या, वितरित झालेली कर्जे इत्यादी बाबींचे विश्लेषणदेखील केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय