शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रादेशिक पक्ष ठरवतील सरकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:28 IST

नवी दिल्ली : नव्या सरकारच्या स्थापनेत प्रादेशिक पक्षांचा खरोखरच मोठा वाटा असेल की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, याकडे सर्वांचे ...

नवी दिल्ली : नव्या सरकारच्या स्थापनेत प्रादेशिक पक्षांचा खरोखरच मोठा वाटा असेल की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात,रालोआमध्येही शिवसेना, अकाली दल, अपना दल अण्णा द्रमुक, जनता दल (यू) असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेतच. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची मदत भाजपला लागेलच.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव प्रादेशिक पक्षांची वेगळी आघाडी करू पाहत आहेत, तर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेसच्या पाठिशी अनेक प्रादेशिक पक्षांची ताकद उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यासाठी तृणमूल, द्रमुक, बिजू जनता दल अशा अनेक पक्षांच्या ते सातत्याने संपर्कात आहेत.पण प्रामुख्याने चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती, जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हे पक्ष काय भूमिका घेणार आणि त्यांच्या भूमिकेची सरकार स्थापनेत गरज भासणार का, हा खरा प्रश्न आहे. हे तिन्ही पक्ष बिगरभाजप व बिगर काँग्रेस आघाडी वा तटस्थतेची भाषा करीत आहेत.

काही प्रादेशिक पक्ष आताच भाजप, तर काही काँग्रेसबरोबर आहेत. त्यामुळे भाजप वा काँग्रेसच्या आघाडीला बहुमत न मिळाल्यास या तीन प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरतील, पण त्या बदल्यात ते काय मागतात, हे महत्त्वाचे असेल.प्रादेशिक पक्षांना ११५ जागांचा अंदाजकाँग्रेस व भाजपच्या आघाडीत नसलेल्या पक्षांना मिळून ११५ पर्यंत जागा मिळतील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. हा आकडा मोठा असून, त्यात आम आदमी पक्ष, टीआरएस, तृणमूल सप, बसप आघाडी, बिजद यांचा समावेश आहे. त्यातील काही पक्षांची काँग्रेसला पाठिंबा देण्याची आताच तयारी आहे.