शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

प्रादेशिक पक्ष ठरवतील सरकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:28 IST

नवी दिल्ली : नव्या सरकारच्या स्थापनेत प्रादेशिक पक्षांचा खरोखरच मोठा वाटा असेल की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, याकडे सर्वांचे ...

नवी दिल्ली : नव्या सरकारच्या स्थापनेत प्रादेशिक पक्षांचा खरोखरच मोठा वाटा असेल की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात,रालोआमध्येही शिवसेना, अकाली दल, अपना दल अण्णा द्रमुक, जनता दल (यू) असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेतच. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची मदत भाजपला लागेलच.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव प्रादेशिक पक्षांची वेगळी आघाडी करू पाहत आहेत, तर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेसच्या पाठिशी अनेक प्रादेशिक पक्षांची ताकद उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यासाठी तृणमूल, द्रमुक, बिजू जनता दल अशा अनेक पक्षांच्या ते सातत्याने संपर्कात आहेत.पण प्रामुख्याने चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती, जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हे पक्ष काय भूमिका घेणार आणि त्यांच्या भूमिकेची सरकार स्थापनेत गरज भासणार का, हा खरा प्रश्न आहे. हे तिन्ही पक्ष बिगरभाजप व बिगर काँग्रेस आघाडी वा तटस्थतेची भाषा करीत आहेत.

काही प्रादेशिक पक्ष आताच भाजप, तर काही काँग्रेसबरोबर आहेत. त्यामुळे भाजप वा काँग्रेसच्या आघाडीला बहुमत न मिळाल्यास या तीन प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरतील, पण त्या बदल्यात ते काय मागतात, हे महत्त्वाचे असेल.प्रादेशिक पक्षांना ११५ जागांचा अंदाजकाँग्रेस व भाजपच्या आघाडीत नसलेल्या पक्षांना मिळून ११५ पर्यंत जागा मिळतील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. हा आकडा मोठा असून, त्यात आम आदमी पक्ष, टीआरएस, तृणमूल सप, बसप आघाडी, बिजद यांचा समावेश आहे. त्यातील काही पक्षांची काँग्रेसला पाठिंबा देण्याची आताच तयारी आहे.