शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

टीकाकारांकडे दुर्लक्ष करून त्यांचेही साहित्य वाचा

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

सदानंद मोरे : प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार

सदानंद मोरे : प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार
नाशिक : साहित्य संमेलन हे चर्चेचे व्यासपीठ आहे. त्यातून नव साहित्यिकांना प्रेरणा मिळते आणि साहित्याच्या दिशेवर चर्चा होते. त्यामुळे त्यावर कोणी काय भाष्य करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. त्यामुळे टीकाकारांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांचेही साहित्य वाचत राहा असा सल्ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिला.
घुमान येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिकच्या वारकरी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, साहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चा होते. त्यातून भविष्यविषयक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सापडत असतात. त्या मार्गदर्शक सूत्रांमधून पुढील काम सुरू असते. आधुनिक काळात सोशल मीडियावर साहित्य येत असताना त्यापासून संत साहित्यही दूर नाही. सामान्य लोकांना समजेल अशा स्वरूपात ज्ञानेश्वरी, गाथा इंटरनेटवर आली असून, त्याच्या सीडीही तयार झाल्याने आधुनिक काळात संतसाहित्य मागे नसल्याचे ते म्हणाले.
राजकीय हस्तक्षेपाबाबत बोलताना ते म्हणाले की, साहित्य विश्वातले लोक अजून दुर्गा भागवत यांच्या छायेतून बाहेर आलेले नाहीत. आता त्यांनी त्यातून बाहेर येऊन विचार करावा. मराठी साहित्य संमेलन राज्याबाहेर होत असल्याने त्यावर टीका करण्याऐवजी आता खरे मराठी साहित्याला भारतीय साहित्याचे स्वरूप प्राप्त होत असून, आपल्या पूर्वजांनी राज्याबाहेर काय सहभाग दिला आहे. याचा शोध घ्याचा प्रयत्न करायचा असेल संमेलनाला व्यापक अवकाश प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी सरहद संस्थेला आणि आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजेत, असेही ते म्हणाले.