शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

हंजीर प्रकल्पातून २ ट्रक भंगार चोरीस मक्तेदाराचा प्रकल्प सुरू करण्यास नकार : स्वमर्जीने केला लवादक नियुक्त

By admin | Updated: November 7, 2015 00:04 IST

जळगाव : मनपाने आव्हाणे शिवारात बीओटी तत्वावर उभारलेल्या हंजीर बायोटेक व गेल्या अडीच वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून गुरूवारी सायंकाळी दोन ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान मक्तेदाराने प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास नकार देत परस्पर लवादकाची नेमणूक केल्याबाबतचे पत्र मनपाला शुक्रवारी प्राप्त झाले. त्यामुळे मनपाने तातडीने पत्र पाठवून लवादक नियुक्तीला हरकत घेतली आहे.

जळगाव : मनपाने आव्हाणे शिवारात बीओटी तत्वावर उभारलेल्या हंजीर बायोटेक व गेल्या अडीच वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून गुरूवारी सायंकाळी दोन ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान मक्तेदाराने प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास नकार देत परस्पर लवादकाची नेमणूक केल्याबाबतचे पत्र मनपाला शुक्रवारी प्राप्त झाले. त्यामुळे मनपाने तातडीने पत्र पाठवून लवादक नियुक्तीला हरकत घेतली आहे.
मनपाने मे २००७ मध्ये हंजीर बायोटेक पुणे यांच्याशी मनपाच्या आव्हाणे शिवारातील जागेवर बीओटी तत्वावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी करार केला होता. १२ जून २०१० रोजी कार्यान्वित झालेला हा प्रकल्प मक्तेदाराने आग लागल्याचे निमित्त करीत परस्पर २४ जून २०१३ पासून बंद करून टाकला आहे. या ठिकाणी असलेले जनरेटर व इतर सामान मक्तेदाराने घेऊन जाण्याचा प्रयत्न मनपाच्या तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील व कर्मचार्‍यांनी हाणून पाडला होता. मात्र त्यानंतरही मनपा प्रशासनाने या ठिकाणी केवळ दिवसाच कर्मचारी नेमले असल्याने मोठ्या प्रमाणावर भंगार चोरीस जात आहे. मक्तेदाराकडूनही ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून नेले जात असल्याचे समजते. गुरूवारी देखील दोन ट्रकमध्ये भंगार भरून नेण्यात आल्याचे समजते. हा प्रकार समजताच भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी उपायुक्त प्रदीप जगताप, आरोग्याधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. शुक्रवारी याची माहिती देऊनही प्रकल्प आपल्या ताब्यात नसल्याचे कारण देत त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.
---- इन्फो----
लवादकाच्या नियुक्तीला मनपाची हरकत
मक्तेदार हंजीर बायोटेकला मनपा आयुक्तांनी प्रकल्प परस्पर बंद केल्याने अंतिम सुनावणी नोटीस बजावली होती. त्यावेळी मक्तेदाराने उपस्थित राहून धार्मिक सण असल्याने आठ-पंधरा दिवस वेळ द्या, प्रकल्प सुरू करतो, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर शुक्रवारी मक्तेदाराकडून मनपाला या प्रकल्पासंदर्भातील वाद सोडविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मोहीत एस. शहा यांची नियुक्ती करीत असल्याचे पत्रच प्राप्त झाले. त्यामुळे मक्तेदार आता प्रकल्प सुरू करणार नाही, हे देखील स्पष्ट झाले आहे. मनपाने तातडीने मक्तेदाराला शुक्रवारी पत्र पाठविले असून त्यात मक्तेदाराने ३ मे २००७ रोजी मनपाला करून दिलेल्या करारातील अट क्र.९ नुसार वाद उद्भवल्यास लवादक म्हणून आयुक्त असतील. त्यांचा निर्णय दोन्ही पक्षांवर बांधील राहील, असे मान्य केले आहे. त्यामुळे शहा यांची लवादक म्हणून नियुक्ती करण्यास मनपाने हरकत घेतली आहे.