शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात, १६२.५0 रुपयांनी घसरले दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:59 IST

विनाअनुदान गॅस सिलिंडर तब्बल १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. हल्लीच्या काळातली ही तिसरी दरकपात आहे.

नवी दल्ली : कोरोना संसर्गामुळे सचिंत बनलेल्या भारतीयांसाठी तेल विपणन कंपन्यानी शुक्रवारी खूषखबर देताना स्वयंपाकाच्या विना अनुदान गॅस सिलिंडरच्या दरात घसघशीत कपात केली. विनाअनुदान गॅस सिलिंडर तब्बल १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. हल्लीच्या काळातली ही तिसरी दरकपात आहे.दिल्लीतील ग्राहकांना आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ७४४ रुपयांऐवजी ५८१.५० रुपयांना मिळेल. मुंबईकरांना त्यासाठी ६७९ रुपये मोजावे लागत होते; तेथे आता ५१४.५० रुपयांना सिलिंडर उपलब्ध असेल. गेली काही वर्षे एलपीजी गॅस सिलिंडरांच्या किमतीचा दर महिन्याच्या पहिल्या तारखेस आढावा घेऊन मूल्य निश्चित केले जाते. आॅगस्ट २०१९पासून हे दर सातत्याने वाढतच होते. मात्र जागतिक उर्जा बाजारपेठेतल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये त्यांत किंचित कपात करण्यात आली होती. त्या मानाने ही तिसरी कपात भरीव समजली जाते.मार्चअखेरीस देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर देशभरात वस्तूंचा साठा करून ठेवण्याची धांदल उडाली होती. त्यावेळीही अनेकानी अतिरिक्त गॅस सिलिंडर घेऊन ठेवले होते. सिलिंडरचा मुबलक साठा देशात असून घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याची ग्वाही विक्रेत्यांनी तसेच तेल कंपन्यांनी देऊनही भारतीय ग्राहक आश्वस्त झालेला नव्हता. देशातील अग्रगण्य इंधन उत्पादक असलेल्या इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने एप्रिल महिन्यातील सिलिंडर विक्रीत तब्बल २०% वाढ झाल्याचे जाहीर केले आहे.भारतातली गॅस सिलिंडरची किंमत दोन घटकांवर अवलंबून असते; अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरच्या तुलनेतले भारतीय रुपयाचे मूल्य आणि एलपीजी अर्थात द्रवरूप पेट्रोलियम वायूचा आंतरराष्ट्रीय प्रमाणित दर. देशभरात स्वयंपाकाचा एलपीजी विवक्षित दरात उपलब्ध असतो, मात्र प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडर अनुदानित किमतीत दिले जातात. हे अनुदान प्रत्यक्ष विक्रीवेळी न देता नंतर ग्राहकाच्या बँक खात्यात वळते केले जाते. देशात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असलेल्या ८ कोटी कुटुंबांना मोफत ३ गॅस सिलिंडर पुरवण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवली असून ती जूनपर्यंत कार्यान्वित असेल.