शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवून २१ वर्षे करा, AAPचे खासदार राघव चड्डा यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:20 IST

Raghav Chadha News: आम आदमी पक्षाचे राज्यसभेमधील खासदार राघव चड्डा यांनी राजकारणात तरुणांच्या भागीदारीचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच देशामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण्याची मागणी केली.

आम आदमी पक्षाचे राज्यसभेमधील खासदार राघव चड्डा यांनी राजकारणात तरुणांच्या भागीदारीचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच देशामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण्याची मागणी केली. सध्या लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे आहे. ही वयोमर्यादा घटवून २१ वर्षे करण्याची मागणी राघव चड्डा यांनी केली आहे. 

निवडणूक लढवण्यासाठीच्या वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित करताना राघव चड्डा म्हणाले की, भारताचं सरासरी वय हे केवळ २९ वर्षे आहे. आपल्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. सुमारे ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र आमचे नेते, आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एवढे तरुण आहेत? देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या, तेव्हा पहिल्या लोकसभेमध्ये २६ टक्के सदस्य हे ४० पेक्षा कमी वयाचे होते. मात्र १७ व्या लोकसभेमध्ये केवळ १२ टक्के सदस्य हे ४० पेक्षा कमी वयाचे होते. जसजसा देश तरुण होत आहे, तसतसं आमच्या नेत्यांचं वय हे वाढत चाललेलं आहे. आपण तरुण नेत्यांसोबत तरुण देश बनण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असे राघव चड्डा म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितले की, सध्या राजकारणाकडे एक बॅड प्रोफेशन म्हणून पाहिलं जातं. मुलं मोठी होतात, तेव्हा आई वडील त्यांना डॉक्टर, इंजिनियर व्हा, क्रीडापटू व्हा, असं सांगतात, मात्र कुणीही मोठा होऊन नेता हो, असं कुणी सांगत नाही. सध्या तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी काही सल्ला देऊ इच्छितो. आपल्या देशात निवडणूक लढण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे एवढी आहे. ही वयोमर्यादा घटवून २१ वर्षे केली गेली पाहिजे.  जर कुणी वयाच्या २१ व्या वर्षी निवडणूक लढवू इच्छित असेल तर त्याला लढू दिलं पाहिजे. जर १८ वर्षांचा तरुण मतदान करून सरकार निवडू शकत असेल. तर तो २१ व्या वर्षी निवडणूक का लढू शकत नाही, असा सवाल राघव चड्डा यांनी विचारला. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAAPआप