शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवून २१ वर्षे करा, AAPचे खासदार राघव चड्डा यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:20 IST

Raghav Chadha News: आम आदमी पक्षाचे राज्यसभेमधील खासदार राघव चड्डा यांनी राजकारणात तरुणांच्या भागीदारीचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच देशामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण्याची मागणी केली.

आम आदमी पक्षाचे राज्यसभेमधील खासदार राघव चड्डा यांनी राजकारणात तरुणांच्या भागीदारीचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच देशामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण्याची मागणी केली. सध्या लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे आहे. ही वयोमर्यादा घटवून २१ वर्षे करण्याची मागणी राघव चड्डा यांनी केली आहे. 

निवडणूक लढवण्यासाठीच्या वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित करताना राघव चड्डा म्हणाले की, भारताचं सरासरी वय हे केवळ २९ वर्षे आहे. आपल्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. सुमारे ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र आमचे नेते, आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एवढे तरुण आहेत? देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या, तेव्हा पहिल्या लोकसभेमध्ये २६ टक्के सदस्य हे ४० पेक्षा कमी वयाचे होते. मात्र १७ व्या लोकसभेमध्ये केवळ १२ टक्के सदस्य हे ४० पेक्षा कमी वयाचे होते. जसजसा देश तरुण होत आहे, तसतसं आमच्या नेत्यांचं वय हे वाढत चाललेलं आहे. आपण तरुण नेत्यांसोबत तरुण देश बनण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असे राघव चड्डा म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितले की, सध्या राजकारणाकडे एक बॅड प्रोफेशन म्हणून पाहिलं जातं. मुलं मोठी होतात, तेव्हा आई वडील त्यांना डॉक्टर, इंजिनियर व्हा, क्रीडापटू व्हा, असं सांगतात, मात्र कुणीही मोठा होऊन नेता हो, असं कुणी सांगत नाही. सध्या तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी काही सल्ला देऊ इच्छितो. आपल्या देशात निवडणूक लढण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे एवढी आहे. ही वयोमर्यादा घटवून २१ वर्षे केली गेली पाहिजे.  जर कुणी वयाच्या २१ व्या वर्षी निवडणूक लढवू इच्छित असेल तर त्याला लढू दिलं पाहिजे. जर १८ वर्षांचा तरुण मतदान करून सरकार निवडू शकत असेल. तर तो २१ व्या वर्षी निवडणूक का लढू शकत नाही, असा सवाल राघव चड्डा यांनी विचारला. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAAPआप