शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच! संमेलनात रंगला परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:37 IST

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.

- स्नेहा मोरेमहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.अ. भा. मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद’ विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाठक बोलत होते. विद्यासगर पाटांगणकर, रेखा नार्वेकर, सुनील शिनखेडे, डॉ. मृणालिनी कामत, डॉ. रेखा घिये-दंडिगे यांचा सहभाग होता. डॉ. पाठक म्हणाले,अभिव्यक्तीचे श्रेष्ठत्व जगण्याला कायम आधार देत असते. हेच श्रेष्ठत्व संत कवयित्रींच्या लेखनात दिसून येते. त्यामुळे वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचे साहित्य काळाला अनुरूप ठरते.आध्यात्मिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाता यावे म्हणून संत कवयित्रींनी हाती लेखणी घेतली. विषमतताविरहित समाजाचेस्वप्न पाहणारा समाजम्हणजे स्त्रीवाद होय अशी मांडणी डॉ. मृणालिनी कामत यांनी केली.रेखा नार्वेकर म्हणाल्या, अध्यात्म आणि काव्य यांचा समन्वय साधून संत कवयित्रींनी लिखाण केले. मुक्ताबाईने तर मी- मी म्हणणाºया पुरुषांचे गर्वहरण केले होते.पाटांगणकर म्हणाले, कवयित्रींची कविता म्हणजे स्वत:शीच असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. व्यक्त व्हावेसे वाटणे ही खरी बंडखोरी आहे.सुनील शिनखेडे यांनी, स्त्रियांचा माणूस होण्याची धडपड हाच खरा संघर्ष आहे. संत कवयित्रींनी तक्रारशून्यजगून स्वत:ला सिद्ध केले. संतांनी या कवयित्रींना फार मोठा आश्रय दिल्याचे भाषणात नमूद केले.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन