शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 08:58 IST

हवाई दलाचं अंतर्गत सर्वेक्षण; जवानांनी सांगितली सेवा सोडण्यामागील कारणं

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील बरेचसे जवान सेवेतून बाहेर पडत असल्याचं वृत्त आहे. एका अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. काम करण्यास पोषक वातावरण नसल्यानं हवाई दलातले जवान त्यांच्या सेवेला पूर्णविराम देत असल्याचं सर्वेक्षण सांगतं. स्टेशन कमांडर, कमांडिंग अधिकारी यांच्यामध्ये या आशयाचं एक पत्र फिरत असल्याचं वृत्त 'द ट्रिब्यून'नं दिलं आहे.हवाई दलातील कर्मचारी सेवेमधून बाहेर पडू इच्छितात का, त्यामागची कारणं काय, याबद्दल दोन वर्ष सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर याबद्दलचं एक पत्र हवाई दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये फिरत आहे. काम करण्यासाठी उपयुक्त वातावरण मिळत नसल्यानं हवाई दलाचे ३२ टक्के जवान २० वर्षांनंतर सेवा सोडतात, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे हवाई दलाची चिंता वाढली आहे.हवाई दलातील सेवा सोडण्यामागे आणखीही काही महत्त्वाची कारणं आहेत. सामान्य नागरी जीवनात चांगले पर्याय मिळत असल्यानंदेखील अनेक जवान हवाई दलाला रामराम करतात. नागरी जीवनात चांगल्या संधी मिळत नसल्यानं हवाई दल सोडणाऱ्यांचं प्रमाण २५ टक्क्यांच्या घरात आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधीचा अभाव (१७ टक्के), कमी वेतन (७ टक्के) अशीदेखील कारणं जवानांना सांगितली आहेत.गेल्या पाच वर्षांत हवाई दलातल्या ४५ टक्के जवानांनी २० वर्षांच्या सेवेनंतर करारपत्रातील सेवा सोडण्याचा मार्ग निवडला. आपली सेवा कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असूनही जवानांनी सेवा सोडण्यास पसंती दिल्याची आकडेवारी हवाई दलानं दिली. 'प्रशिक्षित आणि अनुभवी मानवी संसाधनं गमावणं हवाई दलाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं गरजेचं आहे. हवाई दलाचे जवान अशाच प्रकारे लवकर सेवेतून बाहेर पडू लागल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होईल,' असा मजकूर हवाई दलाच्या पत्रात आहे.पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावाड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल