शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सन्मान, प्रतिष्ठा राखण्यास सीमा ओलांडण्याची तयारी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 05:17 IST

नागरिकांना लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन

द्रास (लडाख) : भारत आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार आहे, अशी गर्जना करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सामान्य नागरिकांनी अशा स्थितीत सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन केले. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे युद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे, कारण नागरिक पुढे आले आहेत आणि युद्धात भाग घेत आहेत. 

२४ व्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील युद्ध स्मारकात सिंह बोलत होते. तत्पूर्वी, त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

राजनाथ सिंग यावेळी म्हणाले की, देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. याचा अर्थ नियंत्रण रेषा ओलांडणे असेल तर आम्ही ते करण्यासही तयार आहोत. आम्हाला चिथावणी दिली गेली आणि गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा आमच्या लोकांनी नेहमीच आमच्या जवानांना पाठिंबा दिला आहे. 

या युद्धात लढलेल्या अनेकांचे नुकतेच लग्न झाले होते, काहींचे लग्न   होणार होते  किंवा काही त्यांच्या कुटुंबाचे एकमेव कमावते होते. मात्र, त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, त्यांचे योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही सिंग यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था) 

कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आले होते. ज्या वेळी भारत पाकिस्तानसोबतचे प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करत होता, त्या वेळी पाकिस्तानने आमच्या पाठीत खंजिर खुपसला.    - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह