शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद स्वीकारण्यासाठी तयार : शशी थरूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:15 IST

काँग्रेस पक्षाने आपल्याला लोकसभेत नेता होण्यासाठी सांगितले तर आपण नेतेपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. यावेळी त्यांनी प्रचारात काँग्रेसकडून झालेल्या चुका सांगितल्या.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा आता संसदेच्या सत्रावर लागल्या आहेत. काँग्रेस पक्ष सलग दुसऱ्यांदा विरोधपक्ष नेतेपदापासून दूर राहिला आहे. या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खरगे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे लोकसभेत काँग्रेस नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. तर शशी थरुर यांनी लोकसभेत काँग्रेस नेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तिरुअंतपुरममधून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले थरुर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने आपल्याला लोकसभेत नेता होण्यासाठी सांगितले तर आपण नेतेपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. यावेळी त्यांनी प्रचारात काँग्रेसकडून झालेल्या चुका सांगितल्या. काँग्रेसची या निवडणुकीतील मुख्य थीम 'न्याय' होती. मात्र न्याय योजनेची माहिती ग्राउंड लेव्हलपर्यंतच पोहोचलीच नसल्याचे थरूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सॉफ्ट हिंदुत्वावर टीका केली. न्याय योजनेनुसार देशातील गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे. पक्ष त्यांच्या मदतीसाठी विभागवार कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी विचार करू शकतो, असंही थरूर यांनी सांगितले. थरूर २००९ पासून तिरुअंनतपुरमधून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ मध्ये थरूर यांनी भाजपच्या के.ओ. राजगोपाल यांचा पराभव केला होता.

२०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. मात्र गेल्यावेळी प्रमाणे यावेळी देखील काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ मिळवता आले नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा जिंकणे आवश्यक असते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस