शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

४0% नोटा ग्रामीण भागात पोहोचवा - आरबीआय

By admin | Updated: January 4, 2017 00:15 IST

नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. नोटाबंदीची ५0 दिवसांची मुदत संपली असली तरी अनेक क्षेत्रांत परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने दररोजच्या पैसे काढण्यावर घातलेली २४ हजारांची मर्यादा उठविलेली नाही. ग्रामीण भागातील स्थिती आणखी वाईट आहे. ग्रामीण भागातील नोटांचा पुरवठा गरजेनुसार होताना दिसून येत नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी करून बँकांसाठी निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या पार्श्वभूमीवर आवश्यक पावले आधीच उचलण्यात आली आहेत. बँकांनी आपल्याला मिळालेल्या नोटा क्षेत्रीय ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, वाणिज्य बँकांच्या ग्रामीण शाखा, व्हाइट लेबल एटीएम आणि टपाल कार्यालये यांना योग्य प्रमाणात वितरीत कराव्यात. हे काम प्राधान्याने व्हायला हवे. कारण ग्रामीण क्षेत्रांत रोख वितरणाचे मुख्य वाहिन्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. (वाणिज्य प्रतिनिधी)- ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत. आपल्या भाषणात मोदी यांनी ग्रामीण भागातील रोख रकमेची समस्या तातडीने दूर करण्यास सांगितले होते. - रिझर्व्ह बँकेने सर्व राज्यांतील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या गरजेची माहितीही घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला आपल्या गरजेप्रमाणे नोटा वितरीत करण्यात आल्या आहेत.