शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

४0% नोटा ग्रामीण भागात पोहोचवा - आरबीआय

By admin | Updated: January 4, 2017 00:15 IST

नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. नोटाबंदीची ५0 दिवसांची मुदत संपली असली तरी अनेक क्षेत्रांत परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने दररोजच्या पैसे काढण्यावर घातलेली २४ हजारांची मर्यादा उठविलेली नाही. ग्रामीण भागातील स्थिती आणखी वाईट आहे. ग्रामीण भागातील नोटांचा पुरवठा गरजेनुसार होताना दिसून येत नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी करून बँकांसाठी निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या पार्श्वभूमीवर आवश्यक पावले आधीच उचलण्यात आली आहेत. बँकांनी आपल्याला मिळालेल्या नोटा क्षेत्रीय ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, वाणिज्य बँकांच्या ग्रामीण शाखा, व्हाइट लेबल एटीएम आणि टपाल कार्यालये यांना योग्य प्रमाणात वितरीत कराव्यात. हे काम प्राधान्याने व्हायला हवे. कारण ग्रामीण क्षेत्रांत रोख वितरणाचे मुख्य वाहिन्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. (वाणिज्य प्रतिनिधी)- ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत. आपल्या भाषणात मोदी यांनी ग्रामीण भागातील रोख रकमेची समस्या तातडीने दूर करण्यास सांगितले होते. - रिझर्व्ह बँकेने सर्व राज्यांतील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या गरजेची माहितीही घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला आपल्या गरजेप्रमाणे नोटा वितरीत करण्यात आल्या आहेत.