शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

RBI Vs Government : पटेल यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 06:51 IST

तूर्तास चर्चेला पूर्णविराम; मोदी सरकार व रिझर्व्ह बँकेतला वाद तूर्त शमला

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : मोदी सरकारचा अहंकार व रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांचा संकोच, यामुळे वाढत चाललेल्या वादामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल निराश मन:स्थितीत असून, आपल्या पदाचा ते कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची शक्यता बुधवारी वर्तवली गेली. मात्र, काहीतरी तडजोड निश्चितपणे झाली असून, तूर्त तरी पटेल राजीनामा देणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.पटेल यांच्या राजीनामा देण्याच्या शक्यतेविषयी अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बँकेने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न दोन्हींकडून सुरू झाले. काही कॉर्पोरेट कंपन्यांनीही मध्यस्थी केल्याचे समजते. मात्र, राजीनाम्याची शक्यता नसल्याच्या वृत्तामुळे सेन्सेक्स अचानक ५५0 अंकांनी वाढल्याचे दुपारनंतर दिसले. पटेल यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी, सप्टेंबर २0१९ पर्यंत आहे. ते हा कार्यकाळ पूर्ण करतील की नाही, याबाबतच्या शंकांना आता विराम मिळाला आहे.अर्थव्यवस्था सध्या गटांगळ्या खात आहे. रुपयाची घसरण सुरूच आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचे चक्र सुरूच असल्याने आंतरबँकिंग मुद्रा बाजारात रुपयाची स्थिती ७४.११ पैसे प्रति डॉलरवर आली. रिझर्व बँक विरुद्ध मोदी सरकार हे भांडण व बँकेच्या कारभारात सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप चव्हाट्यावर आल्यामुळे हा वाद टोकाला जाण्याचे वातावरण होते. तथापि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने दोन पावले मागे घेतल्याचे दिसत आहे.एका अर्थविषयक दैनिकाने मोदी सरकार आरबीआय कायद्याच्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेला विशेष आदेश देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिल्याने सकाळी गोंधळ सुरू झाला. नॉन बँकिंग फायनान्स व पेमेंट कंपन्यांना रोखीचा पुरवठा, कमजोर राष्ट्रीयीकृत बँकांना अर्थसहाय्य व एसएमई कर्जे याविषयी सरकार व बँक व्यवस्थापनात काही वाद झाल्याचा संदर्भ वृत्तात होता.पेमेंट सिस्टिमसाठी स्वतंत्र नियामक संस्था तयार करणे मोदी सरकारचा मनसुबा असल्याची चर्चा काही दिवस सुरूच आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असलेले हे काम सरकार काढून घेऊ इच्छित असल्याचा संशय त्यामुळे निर्माण झाला. सरकारचा हा इरादा रिझर्व्ह बँकेच्या उच्चपदस्थांना अजिबात मान्य नव्हता. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने एका टिपणाद्वारे त्यास विरोध केला. आरबीआय कायद्याच्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेला सार्वजनिक हिताच्या मुद्यांवर जनतेसाठी सोयीस्कर काम करण्याचे आदेश देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. सरकारने तशा आशयाची पत्रेही रिझर्व्ह बँकेकडे पाठवली आहेत. सरकारने कलम ७ चा वापर करून प्रत्यक्ष आदेश दिल्यास उर्जित पटेल राजीनामा देतील, असा अंदाज व्यक्त केला गेला होता.सारे काही ठिक होईल‘रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता आवश्यक आहे, सरकार स्वायत्ततेचा सन्मान करते. बँक व सरकार दोघांनी जनहित पाहून काम करावे, काही मुद्द्यांवर सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात नियमित चर्चा सुरू आहे. लवकरच सारे ठीक होईल. ऊर्जित पटेल व विरल आचार्य अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील व मार्ग काढतील,’ असे निवेदन अर्थमंत्रालयाने दुपारी जारी केले.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार