शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र गायकवाड यांना खेद; विमानबंदी उठण्याची शक्यता

By admin | Updated: April 7, 2017 06:30 IST

शिवसेनेचे रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने लोकसभेत गुरुवारी रुद्रावतार धारण केला

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- शिवसेनेचे रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने लोकसभेत गुरुवारी रुद्रावतार धारण केला आणि विमानबंदी उठवण्याचा निर्णय १0 एप्रिलपर्यंत न झाल्यास ११ एप्रिलच्या रालोआच्या बैठकीला आम्ही हजर राहणार नाही, असे संजय राऊ त यांनी जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी गायकवाड एअर इंडियाची माफी मागेपर्यंत प्रवासबंदी उठणार नाही, अशी आग्रही भूमिका नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतल्यामुळे कोंडी कायम आहे. गायकवाडांनी संसदेत व विमानात घडलेल्या प्रकरणाबाबत खेद व्यक्त करणारे पत्र राजू यांना संध्याकाळी पाठविल्याची चर्चा असून, त्यामुळे तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यास किती वेळ लागेल, हे सांगणे अवघड आहे.गायकवाडांनी निवेदन केल्यानंतर विमान वाहतूक मंत्री म्हणाले की, दररोज हजारो प्रवासी विमानाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणे शक्य नाही. शिवसेनेला सदर प्रकरण शांततेने मिटवायचे असेल, तर ते मिटवायची तयारी आहे. प्रकरण वाढवायचे असेल तर तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे. या विधानामुळे सेना सदस्य संतप्त झाले. त्याचवेळी एखाद्यावर कोणत्या कायद्याने एअरलाइन्स एकतर्फी बंदी घालू शकतात, असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाला अन्य विरोधी खासदारांनीही साथ दिली. परिणामी संतप्त वातावरणात आणखी भर पडली आणि अनंत गीते अशोक गजपती राजू यांच्यावर भडकले. त्यांना शांत करून, त्यांच्या आसनावर बसवण्यासाठी स्मृती इराणी व गृहमंत्री राजनाथसिंगांना हस्तक्षेप करावा लागला. दुसरीकडे राज्यमंत्री अहलुवालियाराजू यांना सभागृहाबाहेर घेऊ न गेले. नंतर पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत म्हणाले की, गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी त्वरित उठवली गेली नाही तर १0 तारखेला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही. हे आपण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सांगत आहोत. >तीनदा कामकाज तहकूबया सर्व गदारोळात आधी एकदा आणि नंतर दोनदा लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकूब केले. दुपारी ३ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा प्रकरणावर पडदा टाकताना राजनाथसिंह म्हणाले, अशा दुर्दैवी घटना सभागृहात घडायला नकोत. गायकवाडांनी आपले म्हणणे मांडले आहे. गीते व राजू यांची चर्चा झाली आहे. गायकवाड यांच्या विमानप्रवासावर एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी घातलेल्या बंदी प्रकरणातून सामंजस्याने लवकरच मार्ग काढला जाईल. >एअर इंडिया कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढविणारशिवसेना खासदारांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत एअर इंडिया मुंबई आणि पुणे विमानतळांवरील आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढविणार आहे. या दोन विमानतळांवरील एअर इंडियाचे काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेना खासदारांनी दिला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नाही, असे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. मुंबई आणि पुणे विमानतळावरील एअर इंडियाचे काही कर्मचारी भारतीय कामगार सेनेशी संलग्न असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणार आहेत.>त्यांची औकात काय? पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले : कोण सीएमडी? त्याची औकात ती काय? विजय मल्ल्यासारख्या आर्थिक गुन्हेगारांना देशातून पळून जाण्यासाठी ज्या विमान कंपन्या मदत करतात, गुन्हेगार, दहशतवादी बिनदिक्कतपणे ज्यांच्या विमानातून फिरतात, त्या एअरलाइन्स गायकवाडांवर बंदी कशी घालू शकतात? गायकवाड काय दहशतवादी आहेत? आम्हाला सभ्यपणा शिकवणाऱ्यांनी अगोदर स्वत: सभ्यपणे वागायला शिकावे. कोणाच्या दबावाखाली हे सारे घडते आहे? कोण शिवसेनेला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे, असा सवाल करून राऊत पुढे म्हणाले, सर्वांना आम्ही एकच गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवसेना हा आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही.