शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

रवींद्र गायकवाड यांना खेद; विमानबंदी उठण्याची शक्यता

By admin | Updated: April 7, 2017 06:30 IST

शिवसेनेचे रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने लोकसभेत गुरुवारी रुद्रावतार धारण केला

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- शिवसेनेचे रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने लोकसभेत गुरुवारी रुद्रावतार धारण केला आणि विमानबंदी उठवण्याचा निर्णय १0 एप्रिलपर्यंत न झाल्यास ११ एप्रिलच्या रालोआच्या बैठकीला आम्ही हजर राहणार नाही, असे संजय राऊ त यांनी जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी गायकवाड एअर इंडियाची माफी मागेपर्यंत प्रवासबंदी उठणार नाही, अशी आग्रही भूमिका नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतल्यामुळे कोंडी कायम आहे. गायकवाडांनी संसदेत व विमानात घडलेल्या प्रकरणाबाबत खेद व्यक्त करणारे पत्र राजू यांना संध्याकाळी पाठविल्याची चर्चा असून, त्यामुळे तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यास किती वेळ लागेल, हे सांगणे अवघड आहे.गायकवाडांनी निवेदन केल्यानंतर विमान वाहतूक मंत्री म्हणाले की, दररोज हजारो प्रवासी विमानाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणे शक्य नाही. शिवसेनेला सदर प्रकरण शांततेने मिटवायचे असेल, तर ते मिटवायची तयारी आहे. प्रकरण वाढवायचे असेल तर तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे. या विधानामुळे सेना सदस्य संतप्त झाले. त्याचवेळी एखाद्यावर कोणत्या कायद्याने एअरलाइन्स एकतर्फी बंदी घालू शकतात, असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाला अन्य विरोधी खासदारांनीही साथ दिली. परिणामी संतप्त वातावरणात आणखी भर पडली आणि अनंत गीते अशोक गजपती राजू यांच्यावर भडकले. त्यांना शांत करून, त्यांच्या आसनावर बसवण्यासाठी स्मृती इराणी व गृहमंत्री राजनाथसिंगांना हस्तक्षेप करावा लागला. दुसरीकडे राज्यमंत्री अहलुवालियाराजू यांना सभागृहाबाहेर घेऊ न गेले. नंतर पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत म्हणाले की, गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी त्वरित उठवली गेली नाही तर १0 तारखेला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही. हे आपण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सांगत आहोत. >तीनदा कामकाज तहकूबया सर्व गदारोळात आधी एकदा आणि नंतर दोनदा लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकूब केले. दुपारी ३ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा प्रकरणावर पडदा टाकताना राजनाथसिंह म्हणाले, अशा दुर्दैवी घटना सभागृहात घडायला नकोत. गायकवाडांनी आपले म्हणणे मांडले आहे. गीते व राजू यांची चर्चा झाली आहे. गायकवाड यांच्या विमानप्रवासावर एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी घातलेल्या बंदी प्रकरणातून सामंजस्याने लवकरच मार्ग काढला जाईल. >एअर इंडिया कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढविणारशिवसेना खासदारांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत एअर इंडिया मुंबई आणि पुणे विमानतळांवरील आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढविणार आहे. या दोन विमानतळांवरील एअर इंडियाचे काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेना खासदारांनी दिला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नाही, असे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. मुंबई आणि पुणे विमानतळावरील एअर इंडियाचे काही कर्मचारी भारतीय कामगार सेनेशी संलग्न असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणार आहेत.>त्यांची औकात काय? पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले : कोण सीएमडी? त्याची औकात ती काय? विजय मल्ल्यासारख्या आर्थिक गुन्हेगारांना देशातून पळून जाण्यासाठी ज्या विमान कंपन्या मदत करतात, गुन्हेगार, दहशतवादी बिनदिक्कतपणे ज्यांच्या विमानातून फिरतात, त्या एअरलाइन्स गायकवाडांवर बंदी कशी घालू शकतात? गायकवाड काय दहशतवादी आहेत? आम्हाला सभ्यपणा शिकवणाऱ्यांनी अगोदर स्वत: सभ्यपणे वागायला शिकावे. कोणाच्या दबावाखाली हे सारे घडते आहे? कोण शिवसेनेला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे, असा सवाल करून राऊत पुढे म्हणाले, सर्वांना आम्ही एकच गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवसेना हा आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही.