शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बुरोंडी जेटीचा प्रश्न मार्गी लावणार : रवींद्र चव्हाण

By admin | Updated: July 13, 2017 16:36 IST

किनारपट्टी परिसराची केली प्रत्यक्ष पाहणी

आॅनलाईन लोकमतदापोली (जि. रत्नागिरी), दि. १३ : जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारी बंदर अशी ओळख असणाऱ्या बंदरात मच्छीमारी जेटीची उभारणी करावी, अशी मागणी गेली ४० वर्षे मच्छिमार बांधव करीत आहेत. परंतु आजपर्यंत केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. मात्र, राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी बंदराची पाहणी करून जेटीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच जेटी होईल, या आशेवर मच्छीमार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकवॉटर तयार करून जेटीचा विषय मार्गी लावू. त्याशिवाय जेटी उभारता येणे अशक्य आहे. मात्र, ती उभारण्यासाठी काय करावे लागेल? याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक होईल, असे यावेळी चव्हाण म्हणाले.

यावेळी चव्हाण म्हणाले की, आपण या बुरोंडी किनारपट्टी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये सखोल चौकशी करून त्यावर अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. आपण यात स्वत: लक्ष घालून स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या बुरोंडी बंदर जेटीचे काम लवकारात लवकर मार्गी लावू, असे ठोस आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत स्मिता जावकर, उदय जावकर, अजय साळवी, मुश्ताक दरवेश, बावा केळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांची बुरोंडी भंडारी समाजाचे अध्यक्ष सुहास हेदुकर, संदीप शेवडे, अशोक बागकर, नवरंग बागकर, श्रीराम बागकर यांनी भेट घेतली.