शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रावणाचे दहन करतात आणि मंदिरांमध्ये पूजाअर्चाही केली जाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 02:39 IST

दस-याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे दहन केले जाते. समाजातील वाईट गोष्टींचे प्रतीक म्हणून रावणाकडे पाहिले जाते. सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेणारा राक्षस म्हणून रावणाचे वर्णन केले जाते. त्यामुळे दसºयाच्या दिवशी रावणाचे विविध आकारांचे पुतळे तयार करून, त्यांचे दहन ठिकठिकाणी केले जाते.दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वत्र रावण दहन पाहायला प्रचंड गर्दी ...

दस-याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे दहन केले जाते. समाजातील वाईट गोष्टींचे प्रतीक म्हणून रावणाकडे पाहिले जाते. सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेणारा राक्षस म्हणून रावणाचे वर्णन केले जाते. त्यामुळे दसºयाच्या दिवशी रावणाचे विविध आकारांचे पुतळे तयार करून, त्यांचे दहन ठिकठिकाणी केले जाते.दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वत्र रावण दहन पाहायला प्रचंड गर्दी होते. दिल्लीत तर राजकारणीही त्यात सहभागी होतात. रावणाचा अवाढव्य पुतळा सहजपणे अनेकदा जळत नाही. त्यामुळे त्याच्या आत फटाके भरण्याचीही पद्धत आहे. या फटाक्यांचा स्फोट होऊ न पुतळा सहज जळू शकतो हे खरेच, पण त्याबरोबर फटाक्यांच्या स्फोटांमुळे दरवर्षी तिथे असलेल्यांपैकी काहींना इजाही होते.पण अशा राक्षस समजल्या जाणाºया रावणाची भारतात मंदिरे आहेत; आणि राजस्थानातील मंदोदर शहरातील लोक तर त्याला जावई मानतात. रावणाचा विवाह मंदोदरीशी झाला होता आणि ती राजस्थानातील होती, असा समज आहे. जोधपूरपासून १0 किलोमीटरवर मंदोदर गाव आहे आणि तिथे रावणाचे मोठे मंदिर आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये व बिसरखमध्ये, मध्य प्रदेशातील विदिशा शहरात व मंदसौरमध्ये, आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे रावणाचे मंदिर आहे. श्रीलंकेमध्येही रावणाची असंख्य मंदिरे आहेत. तेथील जनतेला तो राक्षस वा दानव वाटतच नाही.तामिळनाडूमध्येही रावणाला राक्षस मानले जात नाही. किंबहुना तो द्राविडी संस्कृतीचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. आर्यांनी द्राविडी संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विरोध करणारा रावण हाच होता, अशी तेथील लोकांची धारण आहे. तामिळनाडूमध्ये द्राविडी संस्कृती जपण्याचा कायम प्रयत्न होत आला आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राजकीय नेत्यांना त्यांनी कधीही जवळ केले नाही.

टॅग्स :Dasaraदसरा