शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अधिकाऱ्यांनी कामात तत्परता न दाखवल्यास बरखास्त करणार : राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:19 IST

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे.येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्यांच्या सन्मान सोहळ्यात राठोड म्हणाले, ‘‘भारतीय खेळांसाठी पैशांची कोणतीही कमतरता नाही; परंतु खेळाडू आणि महासंघाने त्याचा उपयोग योग्य उद्देशासाठी करायला हवा. क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडे आवश्यकता आणि समस्या लवकरात लवकर सोडवण्याची जबाबदारी सोपवली आहे. खेळाडूंना योग्य वेळी प्रोत्साहन रक्कम अथवा निधी मिळण्यास अडचण होत असेल, तर काही अधिकाºयांना बरखास्त केले जाऊ शकते; परंतु खेळाडूंनी आरोप लावण्याआधी चुकाही आमच्याकडून आहे, की त्यांच्याकडून, हे निश्चित करावे. एका अधिकाºयाला आपण निलंबित करणारच होतो, तेव्हा त्यानंतर खेळाडूला एका वर्षाआधीच रक्कम दिली गेली असल्याचे कळले होते.’’भारताने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. राठोड यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या उपस्थितीत पदकविजेत्यांना प्रोत्साहन रक्कम दिली. एमसी मेरी कोम, सुशील कुमार, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, नीरज चोपडा, मनू भाकर, अनिष भानवाला आणि जीतू राय, तेजस्विनी सावंत, राहुल आवारेसह अनेक आघाडीचे खेळाडू या वेळी उपस्थित होते. वैयक्तिक सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये, तर रौप्य आणि कांस्यपदकविजेत्यांना अनुक्रमे २० व १० लाख रुपये देण्यात आले. सांघिक स्पर्धेतील विविध खेळांच्या खेळाडूंना वेगवेगळी रक्कम देण्यात आली.रोख पारितोषिक वितरणानंतर सर्व खेळाडूंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांची भेट घेतली. या वेळी या दोघांनी खेळाडूंचे कौतुक केले. तत्पूर्वी, सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेतली. या वेळी मोदी यांनी खेळाडूंचे कौतुक तर केलेच, पण आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक खेळाच्या खेळाडूंबरोबर मोदींनी छायाचित्र काढले.