शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

रेल्वेच्या ‘कायाकल्पा’ची धुरा रतन टाटांच्या हाती!

By admin | Updated: March 19, 2015 23:26 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : येत्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा ‘कायाकल्प’ घडवून आणण्याचा रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेला संकल्प तडीस नेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.रेल्वे यंत्रणा सुधारणे, ती कार्यक्षम करणे व तिच्या कारभात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणत्या नव्या कल्पना,योजना व पद्धती राबवाव्या लागतील हे सुचविण्याचे काम ही ‘कायाकल्प परिषद’ करेल. टाटा उद्योग समुहाचे मानसेवी अध्यक्ष रतन टाटा हे या परिषदेचे प्रमुख असतील. शिवाय आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन व नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमेन या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दोन सर्वात मोठ्या मान्यताप्राप्त संघटनांचे सरचिटणीस अनुक्रमे शिव गोपाल मिश्रा आणि एम. राघवय्या यांनाही या परिषदेवर सदस्य म्हणून नेमण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले. या दोघांच्या रूपाने रेल्वेचे सर्वच कर्मचारीही एक प्रकारे रेल्वेच्या कायाकल्पाचे शिवधनुष्य पेलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावतील. नव्या कल्पना समोर आल्याखेरीज कायाकल्प शक्य होणार नाही. परिषदेवर लवकरच आणखीही सदस्य नेमले जातील, असे रेल्वेमंत्री म्हणाले.४असे म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळातील खासगी व संस्थानी रेल्वेंचे राष्ट्रीयीकरण केले गेले तेव्हा रेल्वे ताब्यात घेण्याची व ती कार्यक्षमतेने चालविण्याची तयारी टाटा उद्योग समूहाने दर्शविली होती. पण तसे घडले नाही आणि त्यानंतरच्या सुमारे सात दशकांत मरणासन्न अवस्थेप्रत आलेल्या रेल्वेत नवसंजीवनी कशी फुंकावी हे सुचविण्यासाठी सरकारला पुन्हा टाटांकडे वळावे लागले आहे.