शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या ‘कायाकल्पा’ची धुरा रतन टाटांच्या हाती!

By admin | Updated: March 19, 2015 23:26 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : येत्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा ‘कायाकल्प’ घडवून आणण्याचा रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेला संकल्प तडीस नेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.रेल्वे यंत्रणा सुधारणे, ती कार्यक्षम करणे व तिच्या कारभात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणत्या नव्या कल्पना,योजना व पद्धती राबवाव्या लागतील हे सुचविण्याचे काम ही ‘कायाकल्प परिषद’ करेल. टाटा उद्योग समुहाचे मानसेवी अध्यक्ष रतन टाटा हे या परिषदेचे प्रमुख असतील. शिवाय आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन व नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमेन या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दोन सर्वात मोठ्या मान्यताप्राप्त संघटनांचे सरचिटणीस अनुक्रमे शिव गोपाल मिश्रा आणि एम. राघवय्या यांनाही या परिषदेवर सदस्य म्हणून नेमण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले. या दोघांच्या रूपाने रेल्वेचे सर्वच कर्मचारीही एक प्रकारे रेल्वेच्या कायाकल्पाचे शिवधनुष्य पेलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावतील. नव्या कल्पना समोर आल्याखेरीज कायाकल्प शक्य होणार नाही. परिषदेवर लवकरच आणखीही सदस्य नेमले जातील, असे रेल्वेमंत्री म्हणाले.४असे म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळातील खासगी व संस्थानी रेल्वेंचे राष्ट्रीयीकरण केले गेले तेव्हा रेल्वे ताब्यात घेण्याची व ती कार्यक्षमतेने चालविण्याची तयारी टाटा उद्योग समूहाने दर्शविली होती. पण तसे घडले नाही आणि त्यानंतरच्या सुमारे सात दशकांत मरणासन्न अवस्थेप्रत आलेल्या रेल्वेत नवसंजीवनी कशी फुंकावी हे सुचविण्यासाठी सरकारला पुन्हा टाटांकडे वळावे लागले आहे.