शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

देशात असहिष्णुतेचे परिणाम पाहतोय- रतन टाटा

By admin | Updated: October 23, 2016 09:20 IST

उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला

ऑनलाइन लोकमतमध्य प्रदेश, दि. 23 - गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वृत्तीच्या विरोधात आक्रोश होत असतानाच नामचीन उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत काही महिन्यांपूर्वी अनेक राजकीय नेते आणि साहित्यिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता खुद्द रतन टाटांनीच अहिष्णुतेवर चिंता व्यक्त केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे. ते म्हणाले "असहिष्णुता एक शाप आहे, गेल्या काही दिवसांपासून असहिष्णुतेचे परिणाम पाहतो आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीला असहिष्णुता कुठून येते आणि काय आहे, हे माहीत आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे. मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केल्यानंतर रतन टाटांनी कार्यक्रमाला संबोधित करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मताचं समर्थन केलं. "आपल्याला देशात प्रेम आणि आपुलकीचं वातावरण निर्माण करायला हवं. कुणालाही हाणामारी न करता प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सौदार्हपूर्ण वातावरणात टिकवून ठेवण्याची गरज आहे". यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टाटा म्हणाले, "मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यानं यशस्वी व्हावं. तसेच विचारवंतही बनावं. चर्चा, वादविवाद, विश्लेषण आणि असहमती ही सगळी सभ्य समाजाची लक्षणं समजली जातात". आमिर खानच्या सहिष्णुतेच्या वक्तव्यावरून मोठं वादंग उठलं होतं. आता रतन टाटांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.