शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशात असहिष्णुतेचे परिणाम पाहतोय- रतन टाटा

By admin | Updated: October 23, 2016 09:20 IST

उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला

ऑनलाइन लोकमतमध्य प्रदेश, दि. 23 - गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वृत्तीच्या विरोधात आक्रोश होत असतानाच नामचीन उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत काही महिन्यांपूर्वी अनेक राजकीय नेते आणि साहित्यिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता खुद्द रतन टाटांनीच अहिष्णुतेवर चिंता व्यक्त केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे. ते म्हणाले "असहिष्णुता एक शाप आहे, गेल्या काही दिवसांपासून असहिष्णुतेचे परिणाम पाहतो आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीला असहिष्णुता कुठून येते आणि काय आहे, हे माहीत आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे. मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केल्यानंतर रतन टाटांनी कार्यक्रमाला संबोधित करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मताचं समर्थन केलं. "आपल्याला देशात प्रेम आणि आपुलकीचं वातावरण निर्माण करायला हवं. कुणालाही हाणामारी न करता प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सौदार्हपूर्ण वातावरणात टिकवून ठेवण्याची गरज आहे". यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टाटा म्हणाले, "मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यानं यशस्वी व्हावं. तसेच विचारवंतही बनावं. चर्चा, वादविवाद, विश्लेषण आणि असहमती ही सगळी सभ्य समाजाची लक्षणं समजली जातात". आमिर खानच्या सहिष्णुतेच्या वक्तव्यावरून मोठं वादंग उठलं होतं. आता रतन टाटांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.