शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 17:17 IST

होसबळे म्हणाले, "बांगलादेशातील हिंदू, महिला आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले, त्यांच्या हत्या, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचाराच्या घटना अत्यंत चिंतेचा विशय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा निषेध करतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शनिवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत आणि हिंदू अध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून तत्काळ सुटका करावी, असे आवाहन केले आहे. या शिवाय, आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एका निवेदनात भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत आणि त्यांच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी 'लवकरात लवकर' आवश्यक ती पावले उचलावीत, असे आवाहनही केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा निषेध करतो... -होसबळे म्हणाले, "बांगलादेशातील हिंदू, महिला आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले, त्यांच्या हत्या, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचाराच्या घटना अत्यंत चिंतेचा विशय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा निषेध करतो. विद्यमान बांगलादेश सरकार आणि इतर एजन्सिज त्यांना रोखण्याऐवजी केवळ मूकदर्शक बनले आहे.

जागतिक शांतता आणि बंधुत्वासाठी हे आवश्यक -बांगलादेश पोलिसांनी सोमवारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. ते चितगावला जात होते. होसाबळे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बांगलादेश सरकारला आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवण्यात यावेत आणि श्री चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी. या कठीण काळा भारतीय आणि जागतिक समाजाने आणि संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून आपले समर्थन द्यायला हवे. जागतिक शांतता आणि बंधुत्वासाठी हे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCentral Governmentकेंद्र सरकार