शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

बलात्कारी सुटला

By admin | Updated: December 21, 2015 02:33 IST

तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली.

निर्भयाप्रकरणी कायद्याची पूर्तता : निषेध करणाऱ्या पालकांना पोलिसांनी उचललेनवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली. या गुन्हेगाराला एका स्वयंसेवी संस्थेच्या हवाली केले गेले. मात्र त्याला कुठे नेले गेले हे मात्र गोपनीय ठेवले गेले आहे. या गुन्हेगाराला सोडले जाऊ नये यासाठी निदर्शने करणाऱ्या निर्भयाच्या आई-वडिलांसह इतरांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले.कायद्यानुसार त्याला जेवढा काळ बालसुधारगृहात ठेवणे शक्य होते तेवढे ठेवले गेले. त्याने उत्तर प्रदेशातील बदायूँ या आपल्या मूळ गावी परतण्याऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव स्वयंसेवी संस्थेकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्याला त्या संस्थेच्या ताब्यात देऊन त्याची अज्ञात स्थळी रवानगी केली गेली.तो आता पोलिसांच्या कार्यकक्षेत नाही. त्याला नवी ओळख देण्यात आली असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पूर्णपणे पुसून टाकली आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याच्या वेळी बालगुन्हेगार होता एवढ्याच कारणावरून या गुन्हेगाराची फाशी टळली. त्याच्या सोबतच्या इतर तीन सिद्धदोष गुन्हेगारांची फाशी सुप्रीम कोर्टापर्यंत कायम होऊन ते काळकोठडीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) महिला आयोगाचा अयशस्वी प्रयत्नगुन्ह्याच्या वेळी १७ वर्षांचा असलेला हा गुन्हेगार आता २० वर्षांचा झाला असून, कायद्यानुसार त्याला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बालसुधारगृहात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्याला सोडले जाणार हे ठरलेले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून दिल्ली महिला आयोगाने त्याच्या सुटकेविरुद्ध शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीशांनीही पहाटे १.३० वाजता त्यासाठी विशेष खंडपीठ बसविले. पण न्यायाधीशांनी त्याची सुटका टळेल असा कोणताही आदेश न देता आयोगाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निदान सोमवारपर्यंत तरी त्याला सोडू नका, अशी विनंती महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी बालगुन्हेगार न्याय मंडळास केली. पण न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नसल्याने काही करता आले नाही.तीन मुद्द्यांवर याचिकामहिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत या गुन्हेगाराला न सोडण्याची प्रामुख्याने तीन कारणे नमूद केली...१ लोकांच्या मनातील संताप पाहता बाहेर आल्यावर या गुन्हेगाराच्या जिवाला धोका आहे.२ बालसुधारगृहात असताना यूपीतील एका बालगुन्हेगाराने त्याच्या डोक्यात धार्मिक कट्टरवादाचे भूत भरविले असल्याचा ‘आयबी’चा अहवाल आहे.३ तीन वर्षे सुधारगृहात राहून तो सुधारल्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सुटल्यावर पुन्हा तो तेच गुन्हे करण्याची भीती.आम्ही असहाय बनलो आहोत. आमचे सरकार, मग ते राज्याचे असो की केंद्राचे, तुम्ही निदर्शने करता तेव्हा केवळ ऐकून घेते. तुमच्यावर लाठीमार करते. ते तुमच्याबद्दल बेपर्वा असतात.- बद्रीसिंग पांडे, निर्भयाचे वडीलबलात्कारी सुटणार हे सर्वांना माहीत होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत त्याची सुटका होऊ नये यासाठी पुरेशी पावले उचलायला हवी होती. - आशादेवी, निर्भयाची आई