शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बलात्कारी सुटला

By admin | Updated: December 21, 2015 02:33 IST

तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली.

निर्भयाप्रकरणी कायद्याची पूर्तता : निषेध करणाऱ्या पालकांना पोलिसांनी उचललेनवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली. या गुन्हेगाराला एका स्वयंसेवी संस्थेच्या हवाली केले गेले. मात्र त्याला कुठे नेले गेले हे मात्र गोपनीय ठेवले गेले आहे. या गुन्हेगाराला सोडले जाऊ नये यासाठी निदर्शने करणाऱ्या निर्भयाच्या आई-वडिलांसह इतरांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले.कायद्यानुसार त्याला जेवढा काळ बालसुधारगृहात ठेवणे शक्य होते तेवढे ठेवले गेले. त्याने उत्तर प्रदेशातील बदायूँ या आपल्या मूळ गावी परतण्याऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव स्वयंसेवी संस्थेकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्याला त्या संस्थेच्या ताब्यात देऊन त्याची अज्ञात स्थळी रवानगी केली गेली.तो आता पोलिसांच्या कार्यकक्षेत नाही. त्याला नवी ओळख देण्यात आली असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पूर्णपणे पुसून टाकली आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याच्या वेळी बालगुन्हेगार होता एवढ्याच कारणावरून या गुन्हेगाराची फाशी टळली. त्याच्या सोबतच्या इतर तीन सिद्धदोष गुन्हेगारांची फाशी सुप्रीम कोर्टापर्यंत कायम होऊन ते काळकोठडीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) महिला आयोगाचा अयशस्वी प्रयत्नगुन्ह्याच्या वेळी १७ वर्षांचा असलेला हा गुन्हेगार आता २० वर्षांचा झाला असून, कायद्यानुसार त्याला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बालसुधारगृहात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्याला सोडले जाणार हे ठरलेले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून दिल्ली महिला आयोगाने त्याच्या सुटकेविरुद्ध शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीशांनीही पहाटे १.३० वाजता त्यासाठी विशेष खंडपीठ बसविले. पण न्यायाधीशांनी त्याची सुटका टळेल असा कोणताही आदेश न देता आयोगाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निदान सोमवारपर्यंत तरी त्याला सोडू नका, अशी विनंती महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी बालगुन्हेगार न्याय मंडळास केली. पण न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नसल्याने काही करता आले नाही.तीन मुद्द्यांवर याचिकामहिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत या गुन्हेगाराला न सोडण्याची प्रामुख्याने तीन कारणे नमूद केली...१ लोकांच्या मनातील संताप पाहता बाहेर आल्यावर या गुन्हेगाराच्या जिवाला धोका आहे.२ बालसुधारगृहात असताना यूपीतील एका बालगुन्हेगाराने त्याच्या डोक्यात धार्मिक कट्टरवादाचे भूत भरविले असल्याचा ‘आयबी’चा अहवाल आहे.३ तीन वर्षे सुधारगृहात राहून तो सुधारल्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सुटल्यावर पुन्हा तो तेच गुन्हे करण्याची भीती.आम्ही असहाय बनलो आहोत. आमचे सरकार, मग ते राज्याचे असो की केंद्राचे, तुम्ही निदर्शने करता तेव्हा केवळ ऐकून घेते. तुमच्यावर लाठीमार करते. ते तुमच्याबद्दल बेपर्वा असतात.- बद्रीसिंग पांडे, निर्भयाचे वडीलबलात्कारी सुटणार हे सर्वांना माहीत होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत त्याची सुटका होऊ नये यासाठी पुरेशी पावले उचलायला हवी होती. - आशादेवी, निर्भयाची आई