शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

रामटेक... जोड

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकावा, ही रामटेककरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.

पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकावा, ही रामटेककरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.
रामटेकच्या विस्तारीकरणाबाबत गोटेगावपर्यंत सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तोदेखील सर्व्हे अद्याप झाला नाही. रामटेकचे माजी खा. मुकुल वासनिक यांनी विस्तारीकरणाच्या चर्चांना वेग दिला. मात्र, त्यानंतर सर्वकाही शांत पडले. विद्यमान खा. कृपाल तुमाने यांनी अद्याप तरी रामटेकसाठी काहीही केले नसल्याचा आरोप काहींनी केला. रामटेक रेल्वेच्या विस्तारीकरणाचा आवाज त्यांनी लोकसभेत रेल्वे मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवावा, अशी रामटेकरांची अपेक्षा आहे. आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीदेखील केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरींच्या माध्यमातून रामटेक विस्तारीकरणाचा प्रश्न लोकसभेत मांडावा तसेच विधानसभेतही आवाज बुलंद करावा, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, रामटेक हे ना. गडकरींचे सासर आहे. सासरची रेल्वे जावयांनी पुढे रेटावी, ही रामटेककरांची अपेक्षा रास्त आहे.
...
पर्यटनासह व्यापार वाढेल
रामटेक रेल्वे नॅशनल रुटवर आल्यास पर्यटनासोबतच व्यापारवृद्धी होईल. राजकीय इच्छाशक्तीमुळे कठीण कामे सोपी होतात व सोपी कामे अनेक वर्षे रेंगाळली जातात, याचे उदाहरण म्हणजे रामटेक रेल्वेचे विस्तारीकरण आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीन वृत्तीमुळे ही रेल्वे रामटेकातच अडकून पडली आहे. रेल्वेने अदानींच्या तिरोडा येथील पॉवर प्रोजेक्टसाठी रामटेक रेल्वे स्टेशनवर दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला. येथे रामटेक लोकल व मँगनीजची मालगाडी याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही रेल्वे ये-जा करीत नाही. त्यामुळे दुसरा प्लॅटफॉर्म कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्लॅटफॉर्मसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ही कोल सायडिंग जागरूक नागरिकांच्या रेट्यामुळे अदानींना बंद करावी लागली, त्यामुळे तो खर्च व्यर्थ ठरला. अदानींसाठी कोट्यवधी रुपये रेल्वे वाया घालवू शकते; मात्र रामटेक रेल्वेचा स्वातंंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही विस्तार करू शकत नाही, हे अनाकलनीय आहे.