शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

रामटेक... जोड

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकावा, ही रामटेककरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.

पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकावा, ही रामटेककरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.
रामटेकच्या विस्तारीकरणाबाबत गोटेगावपर्यंत सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तोदेखील सर्व्हे अद्याप झाला नाही. रामटेकचे माजी खा. मुकुल वासनिक यांनी विस्तारीकरणाच्या चर्चांना वेग दिला. मात्र, त्यानंतर सर्वकाही शांत पडले. विद्यमान खा. कृपाल तुमाने यांनी अद्याप तरी रामटेकसाठी काहीही केले नसल्याचा आरोप काहींनी केला. रामटेक रेल्वेच्या विस्तारीकरणाचा आवाज त्यांनी लोकसभेत रेल्वे मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवावा, अशी रामटेकरांची अपेक्षा आहे. आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीदेखील केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरींच्या माध्यमातून रामटेक विस्तारीकरणाचा प्रश्न लोकसभेत मांडावा तसेच विधानसभेतही आवाज बुलंद करावा, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, रामटेक हे ना. गडकरींचे सासर आहे. सासरची रेल्वे जावयांनी पुढे रेटावी, ही रामटेककरांची अपेक्षा रास्त आहे.
...
पर्यटनासह व्यापार वाढेल
रामटेक रेल्वे नॅशनल रुटवर आल्यास पर्यटनासोबतच व्यापारवृद्धी होईल. राजकीय इच्छाशक्तीमुळे कठीण कामे सोपी होतात व सोपी कामे अनेक वर्षे रेंगाळली जातात, याचे उदाहरण म्हणजे रामटेक रेल्वेचे विस्तारीकरण आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीन वृत्तीमुळे ही रेल्वे रामटेकातच अडकून पडली आहे. रेल्वेने अदानींच्या तिरोडा येथील पॉवर प्रोजेक्टसाठी रामटेक रेल्वे स्टेशनवर दुसरा प्लॅटफॉर्म तयार केला. येथे रामटेक लोकल व मँगनीजची मालगाडी याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही रेल्वे ये-जा करीत नाही. त्यामुळे दुसरा प्लॅटफॉर्म कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्लॅटफॉर्मसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ही कोल सायडिंग जागरूक नागरिकांच्या रेट्यामुळे अदानींना बंद करावी लागली, त्यामुळे तो खर्च व्यर्थ ठरला. अदानींसाठी कोट्यवधी रुपये रेल्वे वाया घालवू शकते; मात्र रामटेक रेल्वेचा स्वातंंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही विस्तार करू शकत नाही, हे अनाकलनीय आहे.