शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राममंदिरासाठी कायदा अशक्य!

By admin | Updated: May 11, 2015 06:36 IST

राज्यसभेत सरकारचे बहुमत नसणे ही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आणणे आणि कायदा करण्याच्या भाजपाच्या मार्गातील मोठी बाधा आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

अयोध्या : राज्यसभेत सरकारचे बहुमत नसणे ही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आणणे आणि कायदा करण्याच्या भाजपाच्या मार्गातील मोठी बाधा आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राममंदिर बांधण्याबाबतचा केंद्र सरकारचा नाइलाज रविवारी प्रथमच जाहीर केला.भाजपाने मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जारी केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्या येथे राममंदिर बांधण्यासह जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करणे आणि समान नागरी कायदा बनविण्याचे आश्वासन दिले होते. ‘भाजपाकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे राममंदिर बांधण्यासाठी संसदेमध्ये प्रस्ताव आणणे आणि त्याचे कायद्यात रूपांतर करणे या वेळी शक्य होणार नाही. कायदा करण्यासाठी सरकारकडे बहुमत नाही. हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि राममंदिर बांधण्यासाठी सरकार न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करेल,’ असे राजनाथसिंह म्हणाले.विहिंप नेते नृत्यगोपाल दास यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी राजनाथसिंह अयोध्या येथे आले होते. त्यांनी अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी परिसरालाही भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘येत्या काही दिवसांत भाजपाला राज्यसभेत बहुमत मिळाले तर भाजपा अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी प्रस्ताव आणणार काय, असा प्रश्न राजनाथसिंह यांना विचारण्यात आला. त्याला थेट उत्तर न देता; ‘हा काल्पनिक प्रश्न आहे’, असे ते म्हणाले.२४३ सदस्यीय राज्यसभेत सत्तारूढ भाजपाचे ४५ सदस्य आहेत, तर विरोधी पक्षांकडे १३२ सदस्य आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राजनाथसिंह म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत आपण संसदेत दाऊदबद्दल निवेदन देणार आहोत.(वृत्तसंस्था)-----------नक्षलवादावर सरकार गंभीरदाऊदच्या ठावठिकाण्याबद्दल संसदेत देण्यात आलेल्या परस्पर विसंगत उत्तरामुळे मोदी सरकारची फजिती झाली होती. त्यानंतर दाऊद हा पाकिस्तानातच असल्याचे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते. नक्षलवादाबद्दल राजनाथसिंह म्हणाले, नक्षलवादाची समस्या सोडविण्यासाठी सरकार गंभीर आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे रॅली घेतली आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.