शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती", रामललाचे मूर्तीकार अरुण योगीराजही भारावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:00 IST

Ayodhya Ram Mandir : अरुण योगीराज यांनी ही अतिशय सुंदर मूर्ती तयार केली आहे. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्याला हजारो जण उपस्थित होते. संत-महंतांपासून बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. संपूर्ण देशात उत्सव साजरा करण्यात आला. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधकामात सहभागी असलेल्या मजुरांचा सन्मान केला. मजुरांवर पुष्पवृष्टी केली. 

अरुण योगीराज यांनी ही अतिशय सुंदर मूर्ती तयार केली आहे. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे. "मला वाटतं की मी आता जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. माझे पूर्वज, कुटुंबातील सदस्य आणि प्रभू राम यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असं वाटतं की मी स्वप्नांच्या जगात आहे" असं अरुण योगीराज म्हटलं आहे. 

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुबेरटीला येथे गेले. तेथे भगवान शंकराची पूजा केली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीशी निगडित मजुरांचे आभारही मानले. पंतप्रधान मोदींनी कामगारांवर पुष्पवृष्टी केली आणि या योगदानाचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि संबोधनानंतर पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांची भेट घेतली.

 आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत; प्राणप्रतिष्ठेनंतर PM मोदी भावुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. "22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे... कॅलेंडरवर लिहिलेली ही तारीख नाही, तर नव्या काळचक्राचा उदय आहे."

"शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आला आहे, माझं मन अजूनही त्या क्षणात गढून गेले आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत" असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या